नाशिक: कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे होत असलेल्या ९४ अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्द चपळगावकर, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
संमेलनाच्या अखेरच्या दिवशी खजूर गार्डन येथे सकाळी ९ वाजता बालसाहित्य समजून घेऊया बदलत्या काळातील बालसाहित्य संवाद
१० वाजता मुलांशी गप्पा गोष्टी (साहित्यिक प्रश्न)
१०.३० वाजता बालसाहित्य आणि मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास
११.३० वाजता खगोल ते भूगोल
दुपारी १२ वाजता कल्पनामधील नाविन्यता व विज्ञान
दुपारी १ वाजता बालसाहित्य समारोप कार्यक्रम
सकाळी ११ वाजता फार्मसी बिल्डिंग येथे
ऑनलाइन वाचन वाङ्ममय विकासाला तारक की मारक परिसंवाद
दुपारी १ वाजता इंजिनिअरिंग बिल्डिंग मध्ये
साहित्य निर्मितीची कार्यशाळा गरज की थोतांड परिसंवाद
रात्री ८ ते १० जय जय माय मराठी सांस्कृतिक कार्यक्रम
मुख्य मंडपतील कार्यक्रम
सकाळी ९.३० वाजता शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने राजसत्तेचा निर्दयीपणा लेखक, कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटीची भूमिका या विषयावर परिसंवाद होणार आहे.
सकाळी ११.३० वाजता नाशिक जिल्ह्याची निर्मिती १५१ वर्षातील वाटचाल विकास आणि संकल्प परिसंवाद
दुपारी १.३० वाजता वृत्तमाध्यमांचे मनोरंजनीकरण परिसंवाद
सायंकाळी ४ वाजता समारोप कार्यक्रम
आदी कार्यक्रम संपन्न होणार असून नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त (Rahul Gandhi Controversial Statement on Savarkar)…
बंगळुरू : भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवार २५ एप्रिल…
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ (Metro 3) मार्गिकेवर आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या या गाड्यांच्या…
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाविषयी केलेल्या वक्तव्यांप्रकरणी कॉमेडिअन…
पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याचे वाहतूक पोलीसांची माहिती मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. हा अतिरेकी हल्ला करण्यासाठी सशस्त्र…