कर्नाटक लॉकडाऊनच्या दिशेने?

बंगळूरु : कर्नाटक सरकारने ‘ओमायक्रॉन’ रुग्ण सापडल्याची बाब गांभीर्याने घेतली असून आधीच्या कोविड नियमांत बदल करत नवीन गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. सध्या लॉकडाऊनसारखे कोणतेही कठोर पाऊल उचलण्यात आले नसले तरी काही बाबतीत नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. राज्यात येणाऱ्या सर्व विमान प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येणार आहे. त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली तरच त्यांना पुढचा प्रवास करता येणार आहे.


राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव, समारंभ आयोजित करण्यास १५ जानेवारीपर्यंत मनाई असेल. कोविडवरील दोन्ही लस घेतल्या आहेत अशाच व्यक्तींना आता मॉल, थीएटर, सिनेमागृह येथे प्रवेश दिला जाईल. सभा, बैठका, कोणतेही समारंभ, संमेलनं यात जास्तीत जास्त ५०० लोक उपस्थित राहू शकतात. जागेच्या क्षमतेनुसार ही संख्या मर्यादा असेल, असे अशोक यांनी सांगितले.


मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालक सोबत जाणार असतील तर त्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असावे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कर्नाटकमध्ये ‘ओमायक्रॉन’चे जे दोन रुग्ण आढळले त्यापैकी एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेचा नागरिक होता. तो माघारी गेला आहे. तर दुसरा रुग्ण स्थानिक आहे. त्याची प्रकृती आता उत्तम असून त्याच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्या सर्वांचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल