मुंबई: अवकाळी पावसामुळे मच्छिमा-यांच्या नौका किना-याला विसावल्या आहेत. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून होड्या समुद्रात सोडवण्यात मनाई करण्यात आलीय. त्यामुळे मासे खाणा-या खवय्यांसाठी शुक्रवार आणि रविवारसह पुढील चार दिवस सुकेच जाणार आहे.
एरव्ही मासे खाणारे खवय्ये शुक्रवार आणि रविवारची आतुरतेने वाट पाहतात. रविवार तर सुट्टीचा असल्यामुळे यादिवशी खास नॉनव्हेजचे बेत आखले जातात. पण आता अवकाळी पावसामुळे हा रविवार सुकाचं जाणार आहे.
अवकाळी पावसाचा फटका जसा भाज्या आणि फळभाज्यांवर दिसून आला तसा तो आता मच्छिव्यवसायावरही दिसून येत आहे. राज्यात गेले दोन दिवस धोधो पडणारा पाऊस आणि गार वारे यामुळे होड्या समुद्रात सोडण्यात आलेल्या नाही. अनेक नौका आणि होड्या किना-यावर लागल्याने मच्छिमारदेखील हवालदिल झाले आहेत. मच्छिव्यवसाय बंद असल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आधीच कोरोनाने मच्छिमा-यांचं कंबरडं मोडलं होतं आणि आता त्यांना अवकाळी पावसाचादेखील सामना करावा लागत आहे.
नवी दिल्ली: तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढायला जाता तेव्हा बऱ्याचदा एटीएममधून ५००च्याच नोटा येतात. मात्र…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात १४…
कामांसाठी नेमलेल्या कंपन्यांची होणार चौकशी मुंबई (प्रतिनिधी): मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांमध्ये अनियमिता दिसून आल्याने…
मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले…
मुंबई (खास प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेंग्विन…
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…