अवकाळीने आणले डोळ्यांत पाणी

  52

वाडा (वार्ताहर) : तालुक्यात बुधवारी संपूर्ण दिवसभर आणि रात्री जोरदार अवकाळी पाऊस पडल्याने संपूर्ण शेतीत पाणीच पाणी झाले. नियमित पावसाळ्यासारखे पाणी शेतांतून वाहू लागले आहे. या पावसामुळे भातपीकाबरोबर रब्बी पिकांसह भाजीपाला, कलिंगड, वीट उत्पादक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे .प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून त्वरित पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, गुरुवारीही पावसाची रिमझिम सुरूच राहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

वाड्यात रब्बी हंगामात वाल, हरभरा, मूग, तूर, तीळ, भाजीपाला, कलिंगड, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणीही केली आहे. शेत मात्र पूर्णपणे पाण्याने भरल्याने बियाणे कुजून वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

तालुक्यातील सागे येथील शेतकरी अनिल पाटील यांनी चार दिवसांपूर्वी दोन एकर जागेत आधुनिक पद्धतीने कलिंगडची लागवड केली आहे. या संपूर्ण शेतीमध्ये पाणी भरल्याने बियाणे कुजून वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, बोरांडा येथीलही एका शेतकऱ्याने पावणेदोन एकरावर कलिंगडची लागवड केली होती. त्यांचीही शेती पाण्यात भरल्याने कलिंगडाचे बियाणे कुजून वाया जाण्याची शक्यता आहे.


बळीराजाचे सर्व कष्ट पाण्यात


जामघर येथील एका शेतकऱ्याने २०० भाऱ्यांची कापणी केलेली भाताची करपे पाण्यात वाहून गेल्याने आता वर्षभर खायचे काय?, असा प्रश्न या शेतकऱ्याला पडला आहे. वर्षभर काबाडकष्ट केले, पण हे कष्ट अवकाळी पावसाने व्यर्थ घालवल्याने शेतकरी मात्र मेटाकुटीस आले आहेत.

आतापर्यंत कोणत्याही वर्षी अशी नैसर्गिक आपत्ती ओढावली नव्हती. कोरोना काळातही कलिंगडचे उत्पादन घेतले; परंतु या अवकाळी पावसामुळे माझी कलिंगडची संपूर्ण शेती वाया जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.- समीर कवळे, शेतकरी, बोरांडा

वरिष्ठांकडून आदेश येताच शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात होईल. - सुनिल लहांगे, नायब तहसीलदार, वाडा

शेतात कापून ठेवलेले भातपिक अवकाळी पावसाच्या पुरात वाहून गेल्याने वर्षभराच्या खावटीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
- रामचंद्र गोळे, शेतकरी, जामघर
Comments
Add Comment

मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’

Devendra Fadanvis : पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; SDRF आणि NDRF यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री

नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन मुंबई : मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात

Devendra Fadnavis On Sanjay Gaikwad : आमदार गायकवाड बनियान-टॉवेलवर येतो अन् कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याची धुलाई; देवेंद्र फडणवीस म्हणाले, कारवाई...

मुंबई : नेहमीच चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची अक्षरशः गुंडासारखी वर्तवणूक आमदार

'जेएनपीटी आणि वाढवन बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता' – मंत्री नितेश राणे

* परदेशी पतसंस्था १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार * बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण