चैत्यभूमीवर बाबासाहेबांना करता येणार अभिवादन

  120


मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात तसेच मुंबईत ‘ओमायक्रॉन’ विषाणूची भीती असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ऑनलाइन अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. त्याला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतर भीम अनुयायांना चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे दर्शन घेता येणार असल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तथापि, मुंबईबाहेरून आलेल्या अनुयायांना अभिवादनासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आढावा बैठकीत घेतल्याचे महापौरांनी सांगितले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी ऑनलाइन दर्शन घ्यावे, चैत्यभूमी परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. मात्र त्याला विरोध करत इतर सण साजरे केले गेले, कार्यक्रम होत आहेत, मंदिरे उघडण्यात आली आहेत. मग महापरिनिर्वाण दिनावरच बंधने का? असा प्रश्न आंबेडकरी संघटनांकडून विचारला जात होता. दरम्यान, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे यांनी आंबेडकरी अनुयायांना येण्यापासून रोखल्यास लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येतील असा इशारा देण्यात आला होता.


यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरी संघटनांची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत चैत्यभूमीला येणाऱ्या अनुयायांचे कशा प्रकारे नियोजन आणि व्यवस्थापन करता येईल यावर चर्चा झाली. त्यानंतर महापरिनिर्वाण दिनी सर्व भीम अनुयायांना बाबासाहेबांचे दर्शन घेता येणार आहे. तसेच दूरदर्शनवरून ऑनलाईन दर्शन घेता येणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.


विशेष म्हणजे ‘ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेरील अनुयायांना ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर दर्शन घेऊ द्यावे. मुंबईमधील अनुयायांनी त्यानंतर दर्शन घ्यावे असे आवाहान महापौरांनी केले आहे. बाबासाहेबांना अभिवादन करताना कोरोनाच्या सर्व नियमाचे पालन करावे लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता