'ओमायक्रॉन'चा 'राणीबाग'ला फटका

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पालिकेने पुन्हा निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार राणीबागेत पर्यटकांसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. दिवसभरात दहा हजारांपर्यंत पर्यटकांचे नियोजन करून सुट्टीच्या दिवशी दुपारी २ नंतर उद्यान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


महापालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान कोरोनानंतर १ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली. दिवसाला दहा हजार पर्यटक येत असून सुट्टीच्या दिवशी १५ ते १६ हजारांवर जात आहेत. यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सतर्क होत दिवसभरात दहा हजारांपर्यंत पर्यटकांचे नियोजन करून सुट्टीच्या दिवशी दुपारी २ नंतर उद्यान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


१ नोव्हेंबरपासून राणी बाग सुरू झाल्यानंतर सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी असणारी वेळ दुपारी ४ वाजेपर्यंतच करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या १६ हजारांवर गेल्याने धोका असल्यामुळे पालिकेने आता गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करत गर्दी वाढल्यास दुपारी २ वाजता गेट बंद करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे.

Comments
Add Comment

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा