'ओमायक्रॉन'चा 'राणीबाग'ला फटका

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पालिकेने पुन्हा निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार राणीबागेत पर्यटकांसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. दिवसभरात दहा हजारांपर्यंत पर्यटकांचे नियोजन करून सुट्टीच्या दिवशी दुपारी २ नंतर उद्यान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


महापालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान कोरोनानंतर १ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली. दिवसाला दहा हजार पर्यटक येत असून सुट्टीच्या दिवशी १५ ते १६ हजारांवर जात आहेत. यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सतर्क होत दिवसभरात दहा हजारांपर्यंत पर्यटकांचे नियोजन करून सुट्टीच्या दिवशी दुपारी २ नंतर उद्यान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


१ नोव्हेंबरपासून राणी बाग सुरू झाल्यानंतर सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी असणारी वेळ दुपारी ४ वाजेपर्यंतच करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या १६ हजारांवर गेल्याने धोका असल्यामुळे पालिकेने आता गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करत गर्दी वाढल्यास दुपारी २ वाजता गेट बंद करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना