आज हजर न झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई

  61

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्यात संपावर असलेल्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी शनिवारपर्यंत कामावर येण्याची वेळ मागितली आहे. त्यामुळे या काळात कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा परिवहन महामंडळाने दिला आहे. दरम्यान शनिवारी जे कामगार कामावर येतील यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महमंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिले.


मुंबई सेंट्रल आगारात एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पगारवाढ झाल्यामुळे कामगारांना चांगली पगारवाढ मिळाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कामगार कामावर येऊ लागले आहेत. या पगारवाढीमुळे अनेक कामगारांच्या ग्रेडमध्ये फरक पडू शकतो, असे या चर्चेत दिसून आले. यावर संप मिटल्यावर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले.


विलीनीकरणाचा मुद्दा सध्या न्यायप्रवीष्ट आहे. तोपर्यंत संप चालू राहणे एसटीला, कर्मचाऱ्यांना तसेच ग्राहकालाही परवडणारे नाही. त्यामुळे शासन अनेक पावले मागे आले आहे.


आता कामगारांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावे. आज रोजंदारीवरील ५०० कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. कामगार हजर न झाल्यास शासनाला कठोर कारवाईचा बडगा उचलावा लागेल, असेही परब म्हणाले.


शुक्रवारी परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक झाली. इंटक आणि कामगार सेना संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.


कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही


एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही मूळ वेतनात दिली असल्याने त्यांच्या ग्रेड्समध्ये काही तफावत निर्माण होऊ शकतात, अशा प्रकारच्या काही बाबींचा उल्लेख त्यांनी केला. संप जेव्हा संपेल तेव्हा यावर चर्चा करू, कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही. कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगारांच्या वर जाणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले. एवढी वाढ दिल्यानंतरही संपाच्या बाबतीत जो काही संभ्रम आहे, त्याबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली.


बैठकीत काय चर्चा झाली?


बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली. बरेचसे कामगार कामावर रुजू झाले आहेत, एसटी कर्मचाऱ्यांच्या युनियनची कृती समितीशी चर्चा करून याबाबतीत कामगारांचे म्हणणे, किंवा कामगारांची मानसिकता जी गेल्या काही दिवसांत बघितली होती, त्यावर आणि एसटीची सेवा सुरुळीत करण्यासाठी काय उपाय योजले पाहिजेत, याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली.


एसटी कामगार संपावर ठाम


राज्य सरकारने पगारवाढीचा पर्याय दिल्यानंतर एसटी कामगार संपावर ठाम आहेत. एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून संप सुरू आहे.

Comments
Add Comment

गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद! कोणत्या तारखांना बंदी?

जुन्नर: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी

'गोकुळ'ने दूध खरेदी किंमत आणि छोट्या डेअरींसाठीच्या अनुदानात केली वाढ

कोल्हापूर: गोकुळ डेअरी किंवा गोकुळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने

हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत कोसळून मृत्यू

इगतपुरी: जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांचा परत उतरताना पडून मृत्यू