सावंतवाडी (प्रतिनिधी) : परिवहन मंत्री जरी कोकणचे असले तरीही त्यांना कोकणी माणसाबद्दल आत्मीयता नाही. ते केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘कलेक्टर’ आहेत, अशी टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली.
सावंतवाडी एसटी आगारालगत सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सोमवारी दुपारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट देत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
केंद्राच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी आपण लवकरच पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची ग्वाही त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिली.
राणे यावेळी म्हणाले, एसटी महामंडळ हे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येते. मात्र गेले पंधरा दिवस आपल्या न्याय मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत सुमारे ४० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतानाही राज्य सरकार त्यांना खेळवत आहे.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोणत्याही बाबतीत कधीही तोडगा काढणार नाहीत. खेळवत ठेवणं हेच त्यांचं काम आहे, असेही यावेळी राणे यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाने 'एक्सरसाईज…
मुंबई : छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८…
मुंबई : “ज्यांना काश्मीरला जायचं आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीरला जाणाच्या सहलीची सुरुवात आम्ही आमच्यापासून…
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…