चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणातील चिपळूण व महाड ही दोन्ही शहरे पूरग्रस्त आहेत व येत्या पावसाळ्यात पुन्हा महापुराची टांगती तलवार आहे. यातून केंद्र सरकारने गाळ काढण्याच्या उपाययोजनांवर मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केले आहे. त्यावर नारायण राणे यांनी प्रमोद जठार यांना आश्वासित करून केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासोबत चिपळूण व महाडमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या आठवड्यात दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेऊन प्रमोद जठार यांनी नारायण राणे यांना या संदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. नारायण राणे यांनी प्रमोद जठार यांना आश्वासित करून केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्यासोबत चिपळूण व महाडमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रमोद जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, वाशिष्ठी व काजळी नदीला दरवर्षी पूर येतो. या पुरामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत. यावर्षी जो महापूर आला त्यामध्ये महाड व चिपळूण ही दोन्ही शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. या दोन्ही नद्यांतील गाळ लवकरात लवकर काढणे आवश्यक आहे. परंतु राज्य सरकारचे मंत्री व प्रशासन यंत्रणा फक्त हवेत आश्वासने देत आहेत व कोणतीही कार्यवाही अद्यापही केलेली नाही.
त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत अत्यंत कमी कालावधी राहिला आहे. जर आताच हा गाळ काढला गेला नाही तर पुन्हा एकदा महापुराचा धोका संभवतो. यासाठी केंद्र सरकारने कोकणातील या दोन्ही शहरांना दिलासा द्यावा व त्या दोन्ही नद्यांतील गाळ काढण्याबाबत उपाययोजना करावी, असे आवाहन जठार यांनी केले आहे. प्रमोद जठार यांच्या विनंतीची दखल घेऊन लवकरात लवकर या संदर्भात केंद्रीय जलशक्ती मंत्री शेखावत यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन नारायण राणे यांनी दिले आहे. ही बैठक पुढील काही दिवसांमध्ये आयोजित केली जाईल, असे जठार यांनी सांगितले.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…