आर्यनवरील एनसीबीच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य नाही

  26

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई हायकोर्टाने आर्यन खान जामीन अर्जावर महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. 'आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅट्स पाहिल्यास त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही आणि आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा या तिघांनी कोणतेही कट कारस्थान रचल्याचे त्यातून स्पष्ट होत नाही. याविषयीच्या एनसीबीच्या आरोपात तथ्य दिसत नाही’, असे मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी म्हटले आहे.


‘तिन्ही आरोपी बेकायदा कृत्य करण्याच्या सामायिक हेतूने एकत्र जमले, हे दाखवणारा कोणताही सकारात्मक व ठोस पुरावा एनसीबीने दाखवलेला नाही. उलट आर्यन खान व अरबाझ मर्चंट आाणि मुनमुन धमेचा यांनी स्वतंत्रपणे प्रवास केला आणि संबंधित गुन्हा करण्यासाठी ते मनाने एकत्र आले नव्हते, असेच एनसीबीच्या आतापर्यंतच्या तपासातून दिसते’, असे न्यायमूर्ती सांब्रे यांनी निरीक्षण नोंदवले आहे.


‘तपासाच्या या टप्प्यावर कटकारस्थानाचा आरोप स्पष्ट होत असल्याचे दाखवण्यासाठी उच्चस्तरीय पुरावे दाखवण्याची आवश्यकता नसते, असे एनसीबीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी म्हटले. ते बरोबर आहे. परंतु, कारस्थानाचा आरोप दाखवण्यासाठी किमान मूलभूत पुरावे तरी दिसायला हवे आणि त्याविषयी न्यायालयाने संवेदनशील असणे आवश्यक आहे. अर्जदार हे निव्वळ प्रवासासाठी क्रूझवर होते, हा एनडीपीएस कायद्यातील कटकारस्थानाचा आरोप लावण्यासाठी आधार होऊ शकत नाही’, असे न्यायमूर्ती सांब्रे यांनी म्हटले आहे. जामिनाविषयीच्या आदेशाची सविस्तर प्रत काल उपलब्ध झाल्यानंतरचे हायकोर्टाचे हे निरीक्षण म्हणजे एनसीबीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.


न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला जामीन मंजूर केला होता. त्याविषयीच्या मुख्य आदेशाची प्रत त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी दुपारी उपलब्ध केली. त्यानंतर जामिनासाठी हमीदार देण्याची व अन्य कायेदशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने आर्यनला ती रात्रही तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर ३० ऑक्टोबरला आर्यन तुरुंगातून बाहेर आला.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता