आझाद मैदानात एसटी कर्मचारी उद्या आणखी आक्रमक होणार

  124


पोलिसांचा मोठा बंदोबस्त, आंदोलकांनी बाहेर पडू नये यासाठी तटबंदी




मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचारी आंदोलनाने आता उग्र रुप धारण केले असून संपूर्ण आझाद मैदान एसटी कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराने तुडूंब भरले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मागील ११ दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.


आज भाजप नेते किरीट सोमय्या आझाद मैदानात उपस्थित आहेत. एसटी कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, सरकारकडून अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीकडे लक्ष दिले जात नाही. अशावेळी गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाची आजची दिशा जाहीर केली. एसटीच्या महिला कर्मचारी दुपारी चार वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर जात परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार असल्याचे पडळकरांनी सांगितले होते. पडळकरांच्या या घोषणेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले. पोलीस प्रशासनाने आझाद मैदानात पोलिसांची संख्या वाढवली. आझाद मैदानातून आंदोलक बाहेर पडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


कामगारांच्या आत्महत्यांवर सरकारचे भाष्य नाही, हा कॉमन मिनिममचा भाग आहे? : गोपीचंद पडळकर


एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपू नये अशी आमची भूमिका नाही. राज्य सरकारला हा विषय संपवायचा नाही. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार करण्याचे ठरलंय असे सांगितले जाते. राज्य सरकारमधील तीन पक्षांचा एसटीच्या जागांवर डोळा आहे का?, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार एसटी कामगारांच्या आत्महत्यांवर चर्चा करत नाही. सरकारच्या तिन्ही पक्षांचा हा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला केला आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता