एकाही कामगाराचे निलंबन केलात तर याद राखा

  46


आमदार नितेश राणे यांचा एसटी अधिकाऱ्यांना इशारा




कणकवली (प्रतिनिधी) : गरीब एसटी कामगारांवर निलंबनाची कारवाई करून भीती दाखविण्याचे प्रकार थांबवा. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही एसटी कामगारांचे निलंबन केलेत, तर याद राखा. निलंबनाचे आदेश रद्दबातल करा. संप शांततेत सुरू आहे, कामगार आपल्या हक्काची लढाई लढत आहेत, त्याला डिवचू नका. सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला.


एसटी कामगारांनी आमदार नितेश राणे यांची त्यांच्या कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली असता एसटीचे विभाग नियंत्रक रसाळ यांना फोन करून समज दिली आणि यापुढे निलंबनाची भीती कामगारांना घालू नका, असे बजावले. न्याय हक्कांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा शांततेत सुरू असलेल्या संपाला महामंडळाचे अधिकारी गालबोट लावत असल्याचे आज उघड झाले.


आजवर २५ एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित करण्याचे आदेश विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिले. मात्र, अशा निलंबन आदेशाला भीक घालू नका. आपल्या भूमिकेवर ठाम राहा. भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी आहे. हा लढा नक्की यशस्वी होईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण