स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई देशात चौथी

  75

नवी मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छता अभियान अंतर्गत सर्वेक्षणात नवी मुंबई मनपाने चौथ्या क्रमांकावर आपली मोहोर उमटवली आहे. परंतु सर्वसमावेशक प्रथम श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा मान हुकल्याने सफाई कामगार हळहळ व्यक्त करत आहेत.


झिरो कचरा कुंडी, हागणदारीमुक्त शहर, कचरा वर्गीकरण यामध्ये मनपा अग्रेसर होती व आहे; परंतु इतके करूनही मनपा चौथ्या क्रमांकावर फेकली गेल्याने सफाई कामगारांना भावना अनावर झाल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेली मनपा यावर्षी एका स्थानाने कमी होऊन चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.


केंद्र शासनाकडून आज जाहीर झालेल्या क्रमांकात प्रथम, द्वितीय व तृतीय शहरात अनुक्रमे इंदौर, सुरत व विजय वाडा या महापालिकेने आपले वर्चस्व राखले आहे. तर चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई मनपाने मोहोर उमटवली आहे. परंतु दहा ते चाळीस लोकसंख्या असणाऱ्या मनपात मात्र सर्वात स्वच्छ शहराच्या पुरस्काराने नवी मुंबईला सन्मान प्राप्त झाला आहे. स्वच्छता अभियान सर्वेक्षणास सुरुवात झाल्यापासून नवी मुंबई महानगरपालिका ही राज्यात प्रथम क्रमांकावरच अढळ आहे.



यावर्षी आम्हाला आपला क्रमांक येईल याची खात्री होती. त्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत घेतली. घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली, पण तरीही आम्ही चौथ्या क्रमांकावर फेकलो गेलो याचे दुःख वाटते. - पी. आर. जाधव, सफाई कामगार



झिरो कचरा कुंडी मोहीम राबविण्यास सुरुवात झाल्यावर आम्ही कचरा कुंडी जिथे ठेवली होती. तिथे थांबून कोणीही कचरा टाकणार नाही, याची खबरदारी घेत होतो. जरी आता अपयश आले असले तरी पुढे आम्ही यापेक्षा जास्त काम करू व नवी मुंबई मनपाला पहिल्या स्थानावर पोहोचवू. - यू. बी. पाटील, घनकचरा विभाग





Comments
Add Comment

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री

मुंबईत गिरगाव चौपाटीवर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, पाण्यात उभं राहून घोषणाबाजी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण कमी करू नये, ही मागणी घेऊन लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत.

Sudhir Mungantiwar : हिंदीला विरोध आणि इंग्रजीला आलिंगन! महाराष्ट्राच्या विधानसभेत ९ आमदारांना मराठी नकोशी

विधानसभा अध्यक्षांकडे इंग्रजी कामकाजपत्रिकेची मागणी मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत कामकाजाची पत्रिका

Narayan Rane : घरी बोलवा, मिठ्या मारा; एवढा गवगवा का? राणेंचा एकाचवळी दोन्ही ठाकरे बंधूंवर घणाघात; दिशा सालियन बद्धल काय म्हणाले नारायण राणे?

मुंबई : एकमेकांना घरी बोलवा, जेवा, मिठ्या मारा. पण मराठीसाठी एकत्र येतायत असं भासवण्याचं कारण काय? काय केलं

डॉक्टर तयार करणार की कंपाऊंडर? विधानसभेत निलेश राणेंचा हल्लाबोल!

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची दयनीय स्थिती, आमदार निलेश राणेंचे तीव्र सवाल मंत्री मुश्रीफ यांनी दिले स्वत: पाहणी

जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? मंत्री आशिष शेलारांशी भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते