कायद्याचे नव्हे तर, ‘काय ते द्या’चे राज्य


फडणवीस यांची सरकारवर टीका




मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या कायद्याचे राज्य नाही तर ‘काय द्या’चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी सुरू आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणी पाहायला तयार नाही. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध आणि अवैध रेती, अवैध दारू आणि सट्टा गावोगावी झाला आहे. राज्याची अशी अवस्था कधीच झाली नव्हती, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केली.


भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या एक दिवसीय बैठकीच्या सांगता कार्यक्रमात फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे वाभाडे काढले. महाराष्ट्रावर आज विश्वासार्हतेचे मोठे संकट उभे आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले. एका मुलीवर ४०० लोक बलात्कार करतात. काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करू. पण, येथे सरकारमध्ये केवळ ‘भक्ती’ उपक्रम चालू आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले.


मराठवाडा, विदर्भाच्या सर्व योजना बंद आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही. वैधानिक विकास मंडळे बंद आहेत. सिंचन, पाण्याच्या योजना बंद आहेत. शेतकऱ्यांची वीज बंद आहे. शाळा सुरू केल्या आणि लगेच शाळांच्या वीज कापल्या. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कर कमी केला, तर देशातील २५ राज्यांनी त्यात भर घातली. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही, असे आपले राज्यकर्ते सांगतात.मंदिर बंद होते, पण दारू सुरू होती ना! त्यातून तुम्ही कमाई केलीच ना, असा सवालही फडणवीस यांनी केला.


बिल्डरांना सवलती देताना यांना जीएसटी आठवत नाही. गरिबांना, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटले की, जे पैसे टप्प्याटप्प्याने मिळत आहेत आणि मिळत राहतील त्या जीएसटीचे रडगाणे गातात. सामान्य माणसाची ताकद आता दाखविण्याची वेळ आली आहे. जनतेसाठी, त्यांच्या कल्याणासाठी लढायला मैदानात उतरण्याची वेळ आली आहे, असे आवाहन फडणवीस यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

Comments
Add Comment

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती मुंबई : महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक

महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती

'BMC सोबत समन्वयातून टिळक मनपा मार्केटमधील कोळी बांधवांच्या समस्यांवर तोडगा काढणार'; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

बीएमसीसोबत चर्चा करून मार्केटच्या पुनर्विकासावर तोडगा काढण्याचे  मुंबई : लोकमान्य टिळक महापालिका मार्केटच्या

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलणार; मुख्यमंत्र्यांची परिषदेत माहिती

मुंबई : बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली असून, आता या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ! ५.९६ लाख कर्मचाऱ्यांना दिलासा; वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची घोषणा

मुंबई: राज्य शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा अत्यंत

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्कांची वाढ

मुंबई : राज्य शासनाने राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करण्याचा