रेल्वे सार्वजनिक तक्रार कार्यालयाचे रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन

  35

मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी चर्चगेट येथील रेल्वे सार्वजनिक तक्रार कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यांनी पुननिर्मित फ्रेरे रोड ओव्हर ब्रिज, पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागातील एकात्मिक देखरेख प्रणाली, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील अत्याधुनिक पॉड संकल्पनेवर आधारीत विश्रमालय कक्षाचे उद्घाटनही केले.


रावसाहेब दानवे यांनी अंबरनाथ आणि कोपर रेल्वे स्थानकांवरील होम प्लॅटफॉर्म, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात फूट ओव्हर ब्रिज, एस्केलेटर, लिफ्ट्स आणि टॉयलेट ब्लॉक्स, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील कोच रेस्टॉरंट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथील एक्झिक्युटिव्ह वेटिंग हॉलचे लोकार्पण देखील केले.


यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार मनोज कोटक, आ. आशिष शेलार, आ. राहुल नार्वेकर, आ. मंगल प्रभात लोढा, आ. अतुल भातखळकर, आ. कॅप्टन तामिळ सेल्वन तसेच मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी सर्व पाहुण्यांचे रोपटे देऊन स्वागत केले.

Comments
Add Comment

राज्यात २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई : भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

Chandrashekhar Bawankule : भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन! महसूल मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा

आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मुंबई : नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या

राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक

मुंबईत सर्वाधिक, तर पुण्यात संख्येत घट मुंबई : कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक