भिवंडीत उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाच्या विरोधात आंदोलन

  28

भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण नाका येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उड्डाणपुलावर सुरू असलेल्या कामाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.


भिवंडी महानगरपालिका हद्दीतील दिवंगत राजीव गांधी उड्डाणपूलाची मागील एक महिन्यांपासून दुरुस्ती सुरू आहे; परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल दुरुस्त करीत असताना यामध्ये वापरण्यात येणारी सामग्री निकृष्ट दर्जाची असल्याने या उड्डाणपुलावर होणारा खर्च व्यर्थ असल्याने कोट्यवधी रुपये खर्च हा वाया जाणार असल्याने उड्डाणपुलाचे काम बंद पाडले आहे.


या उड्डाणपुलावर जवळपास ६ कोटीहून अधिक खर्च हा दुरुस्तीसाठी होत आहे; परंतु कामही निकृष्ट दर्जाचे असल्याने यावर होणार खर्च हा व्यर्थ जाणार असल्याने ठेकेदाराने चांगल्या दर्जाचे काम करावे यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून समज दिली आहे. पुढचे आंदोलन हे मनसे स्टाईलने असेल असे मनसे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी सांगितले.


या आंदोलनात मनसे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी, भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, उपशहराध्यक्ष प्रवीण दिवेकर, विद्यार्थीसेना तालुकाध्यक्ष परेश चौधरी व अन्य मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र