भिवंडीत उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाच्या विरोधात आंदोलन

भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण नाका येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उड्डाणपुलावर सुरू असलेल्या कामाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.


भिवंडी महानगरपालिका हद्दीतील दिवंगत राजीव गांधी उड्डाणपूलाची मागील एक महिन्यांपासून दुरुस्ती सुरू आहे; परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल दुरुस्त करीत असताना यामध्ये वापरण्यात येणारी सामग्री निकृष्ट दर्जाची असल्याने या उड्डाणपुलावर होणारा खर्च व्यर्थ असल्याने कोट्यवधी रुपये खर्च हा वाया जाणार असल्याने उड्डाणपुलाचे काम बंद पाडले आहे.


या उड्डाणपुलावर जवळपास ६ कोटीहून अधिक खर्च हा दुरुस्तीसाठी होत आहे; परंतु कामही निकृष्ट दर्जाचे असल्याने यावर होणार खर्च हा व्यर्थ जाणार असल्याने ठेकेदाराने चांगल्या दर्जाचे काम करावे यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून समज दिली आहे. पुढचे आंदोलन हे मनसे स्टाईलने असेल असे मनसे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी सांगितले.


या आंदोलनात मनसे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी, भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, उपशहराध्यक्ष प्रवीण दिवेकर, विद्यार्थीसेना तालुकाध्यक्ष परेश चौधरी व अन्य मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर

मालाडमधील फोर डायमेंशन इमारतीला आग

मुंबई: मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसजवळ लिंक रोडवरील फोर डायमेंशन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी आग लागली. मुंबई

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी