दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

  26


नांदेड हिंसाचार; ५० जणांना अटक




नांदेड (प्रतिनिधी) : त्रिपुरा येथील हिंसाचारानंतर नांदेडमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये दगडफेकीच्या घटनांतील ८३ पैकी ५० जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.शहरातील वातावरण बिघडू पाहणाऱ्यांवर कारवाई करत असताना पोलिसांनी रझा अकादमीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच व्यासपीठावरून प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली आहे.


दगडफेकीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेनं पुकारलेला बंद रद्द करण्यात आला असला तरीही पोलिसांनी सतर्कता बाळगत बंदोबस्त वाढवला असल्याची माहितीही संजय कुमार यांनी दिली आहे. दगडफेक प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चातही दगडफेक झाल्याने गालबोट लागले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होते.


त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात उमटले. राज्यातील नांदेड, अमरावती, परभणी या शहरांमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात दगडफेक करण्यात आली. नांदेड येथे काही युवकांनी त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करत दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हे युवक आक्रमक झाले आणि शिवाजीनगर येथील दुकानाची नासधूस करत, व्यपाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. तसंच शिवाजीनगर, बरकत चौक, देगलूर नका या भागात प्रचंड दगडफेक करण्यात आली होती. मुख्य रस्त्यावर वाहन जाळत दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या. यामुळे नांदेड शहरात काही दिवस तणावाचे वातावरण होते. या घटनेत नागरिक आणि पोलीस अधिकारी जखमी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेत संशयितांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला