नांदेड (प्रतिनिधी) : त्रिपुरा येथील हिंसाचारानंतर नांदेडमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये दगडफेकीच्या घटनांतील ८३ पैकी ५० जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.शहरातील वातावरण बिघडू पाहणाऱ्यांवर कारवाई करत असताना पोलिसांनी रझा अकादमीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच व्यासपीठावरून प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवरही कारवाई करणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली आहे.
दगडफेकीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेनं पुकारलेला बंद रद्द करण्यात आला असला तरीही पोलिसांनी सतर्कता बाळगत बंदोबस्त वाढवला असल्याची माहितीही संजय कुमार यांनी दिली आहे. दगडफेक प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चातही दगडफेक झाल्याने गालबोट लागले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होते.
त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात उमटले. राज्यातील नांदेड, अमरावती, परभणी या शहरांमध्ये काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात दगडफेक करण्यात आली. नांदेड येथे काही युवकांनी त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करत दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हे युवक आक्रमक झाले आणि शिवाजीनगर येथील दुकानाची नासधूस करत, व्यपाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. तसंच शिवाजीनगर, बरकत चौक, देगलूर नका या भागात प्रचंड दगडफेक करण्यात आली होती. मुख्य रस्त्यावर वाहन जाळत दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या. यामुळे नांदेड शहरात काही दिवस तणावाचे वातावरण होते. या घटनेत नागरिक आणि पोलीस अधिकारी जखमी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेत संशयितांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…