Thursday, January 15, 2026

सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवावी

सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवावी

आमदार नितेश राणे यांचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांचे भांडवल करून शुक्रवारी राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेली दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत.

त्रिपुरा हिंसाचाराचे अमरावती, नांदेड, मालेगावात पडसाद

राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. तसेच, मालेगावमध्ये पोलिसांनी परवानगी दिलेली नाही तरी मोर्चा निघतो, दगड फेकले जातात, ताकद दाखवली जातेय.

महाराष्ट्रात हिंदूंना घाबरवलं जातंय आणि महाराष्ट्र सरकार गप्प आहे, हे योग्य नाही. महाराष्ट्र सरकारने हे मोर्चे थांबवले नाहीत, तर हिंदूंचेही मोर्चे निघतील, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशाराही आ. राणे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा