महाराष्ट्रात झाले १० कोटींचे लसीकरण

  28

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता जवळजवळ ओसरली आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असून, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण देखील जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राने मंगळवारी लसीकरणात दहा कोटींचा टप्पा गाठला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.


‘महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच हे यश साध्य झाले आहे. मी सर्वांचे अभिनंदन करतो’, असे ट्विट आरोग्यमंत्री टोपे यांनी केले आहे.



राज्यातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी ‘कवच कुंडले अभियान’ राबविण्यात येत आहे. अलीकडेच ८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या अभियानात शहरी आणि निमशहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशाने गुरुवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत १०० कोटींचा आकडा पार केला होता. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने १०० कोटीवी लस घेतली ती व्यक्ती पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी मतदार संघाची रहिवासी आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी