Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीसावधान! आता आरएसव्ही व्हायरसचा धोका

सावधान! आता आरएसव्ही व्हायरसचा धोका

लक्षणे आढळल्यास चाचणी करण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असतानाच आता मुंबईत आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा व्हायरस वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचा प्रकार आहे. मात्र मुंबईकरांनी न घाबरता याबाबत काही लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाशी लढा सुरु आहे. मुंबईची परिस्थिती पाहता सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मात्र आरएसव्ही व्हायरसचा प्रसार वाढण्याची भीती आहे. आरएसव्ही हा कोरोनासारखा जीवघेणा व्हायरस नसून त्यावर वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे मान्सून संपला असला तरी काही भागात पाऊस पडत आहे. आरएसव्ही व्हायरस हा वातावरणातील बदलामुळे होत असून तो व्हायरल फिव्हरचाच प्रकार आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आरएसव्ही व्हायरस नियंत्रणात येऊ शकतो. तसेच कुठलाही ताप असला, तरी उपचार घेणे आवश्यक आहे. त्वचेला खाज येणे, ताप, खोकला ही आरएसव्हीची लक्षणे असून कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असला तरी वातावरण बदलाने व्हायरसची लागण होण्याचा शक्यता अधिक आहे. तर मुंबईकर सध्या वातावरण बदलामुळे ताप- खोकल्याने त्रस्त आहेत. त्यामुळे ही लक्षणे दिसताच कोरोनासोबतच इतर व्हायरसचीही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबईत केवळ पाच जम्बो सेंटर सुरू

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने केवळ पाच कोरोना जम्बो सेंटर सुरू ठेवण्यात आले आहेत. गरज असेल तिथेच हे वॉर्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -