ड्रग्ज पार्टीच्या तपासासाठी एसआयटी मुंबईत दाखल

  19

मुंबई (प्रतिनिधी) : आर्यन खान ड्रग्ज प्रकरण व अन्य पाच प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनसीबी महासंचालकांनी दिल्ली मुख्यालयातील अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले असून हे पथक शनिवारी मुंबईत दाखल झाले आहे. या तपासाची सूत्रे आता एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्याऐवजी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंह यांच्याकडे असतील. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर आठ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे.


कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबी मुंबई युनिटच्या टीमने छापा टाकला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. ही कारवाई अनेक कारणांनी देशभर गाजत आहे. यात खंडणीवसुलीचा दावा करण्यात आला असून मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. या आरोपांची आधीच एनसीबीने चौकशी सुरू केली आहे. ही सगळी पार्श्वभूमी असताना शुक्रवारी एनसीबी महासंचालकांनी मोठा निर्णय घेत आर्यन खान ड्रग्ज प्रकरण व अन्य पाच प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमली. ही एसआयटी आता या सर्व प्रकरणांचा तपास करणार आहे. त्यात समीर वानखेडे आणि त्यांची टीम साह्य करेल, असे नमूद करण्यात आले आहे.


एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन म्हणाले की, एकूण ६ प्रकरणांची चौकशी आता दिल्लीच्या एनसीबी पथकांकडून केली जाईल, ज्यामध्ये आर्यन खानचे प्रकरण आणि इतर ५ प्रकरणांचा समावेश आहे. हा प्रशासकीय निर्णय आहे.


आर्यन खान प्रकरणाचा तपास समीर वानखेडे करीत होते. या प्रकरणावरून त्यांना हटवल्याची चर्चा रंगू लागली. तथापि, याबाबत समीर वानखेडे यांनी खुलासा केला आहे. मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी माझी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.


अफवांना बळी पडू नका


आर्यन खान प्रकरणावरून समीर वानखेडे यांना हटवण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. याचसंदर्भात आता वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने ट्विट करत, समीर यांना हटवण्यात आलेले नाही. अफवांना बळी पडू नका, असे आवाहन केले आहे. तसेच एनसीबीचे पत्र देखील ट्विटरवरुन शेअर केले आहे.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र