न्यूझीलंडविरुद्ध नामिबियाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

  20

शारजा (वृत्तसंस्था) : टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात (ग्रुप-२) न्यूझीलंडविरुद्ध नामिबियाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. दोन विजय मिळवलेल्या किवींना उपांत्य फेरीची दावेदारी पेश करायची असल्यास उर्वरित दोन्ही लढती जिंकाव्या लागतील.


पाकिस्तानवर वर्चस्व राखता आले नसले तरी न्यूझीलंडने माजी विजेता भारतासह स्कॉटलंडला हरवून ग्रुप-२मध्ये पहिल्या दोन संघांत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने आगेकूच केली आहे. अफगाणिस्तान आणि त्यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस असली तरी किवींचे पारडे जड आहे.


न्यूझीलंडची सर्व आघाड्यांवरील कामगिरी सर्वोत्तम नसली तरी फलंदाजीत अनुभवी मार्टिन गप्टिल, डॅरिल मिचेल, कर्णधार केन विल्यमसन तसेच फिलिप्सने चांगले योगदान दिले आहे. गोलंदाजीत फिरकीपटू ईश सोढी आणि डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने छाप पाडली आहे. विजयी कामगिरीत सातत्य राखायचे असेल तर किवींच्या सर्वच प्रमुख क्रिकेटपटूंना खेळ उंचवावा लागेल.


नामिबियाला तीन सामन्यांतून केवळ स्कॉटलंडवर विजय मिळवता आलेला आहे. अनुभवी संघांविरुद्ध त्यांचा अनुभव कमी पडत आहे. मात्र, प्रतिस्पर्धी संघाच्या चुका शोधल्यास ते सामन्यात चुरस निर्माण करू शकतात.


वेळ : दु. ३.३० वा.

Comments
Add Comment

युजवेंद्र चहलने आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत चाहत्यांना दिली हिंट

मुंबई : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबत घटस्फोट

एजबेस्टनमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

बर्मिंगहॅम : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटीत चांगला

IND vs ENG: शुभमनची जबरदस्त फटकेबाजी, मोहम्मद-आकाशदीपची कमाल

मुंबई : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. लीड्सच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करूनही

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

IND Vs ENG Test Match Day 5: एजबॅस्टन कसोटी सामन्यात पावसामुळे पाचव्या दिवशी खेळण्यास विलंब...

पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर होण्याची शक्यता एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच