मुंबईत ४ कोटींचे हेरॉइन जप्त

  22

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण गाजत असतानाच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनल युनिटने आज मुंबई विमानतळाजवळच्या कार्गो कॉम्प्लेक्स येथून ४ कोटी रुपये किमतीचे हेरॉइन जप्त केले असून गुजरातमधील एका व्यक्तीला याप्रकरणी अटक केली आहे.



सहार येथील इंटरनॅशनल कुरियर टर्मिनलवर पार्सलद्वारे ड्रग्ज येणार असल्याची पक्की खबर एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटला मिळाली होती. त्याआधारे छापा टाकून तपासणी करण्यात आली. यात कार्गो कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमध्ये एका पार्सलमध्ये सफेद पावडरचे पाकीट आढळून आले. हे हेरॉइन असल्याचे स्पष्ट झाले असून त्याची किंमत अंदाजे ४ कोटी रुपये असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.


एनसीबीने याप्रकरणी एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. हे पार्सल गुजरातमधील वडोदरा येथील कृष्णमुरारी प्रसाद याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनसीबीच्या मुंबई कार्यालयात त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू करण्यात आला असून यात आणखी कुणी गुंतले आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.

Comments
Add Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

डॉ.आंबेडकर यांच्या अध्यापन कारकीर्दीस ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शासकीय विधि महाविद्यालय येथे स्मृतिपटलाचे

मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून थेट पाहता येणार आहे. कामकाजाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह

मनसैनिकांनी कार्यालय फोडल्यानंतर व्यावसायिक सुशील केडियांनी मागितली माफी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांच्या

Eknath Shinde : "आजचा मेळावा म्हणजे द्वेष, जळजळ, मळमळ..."; उपमुख्यमंत्री शिंदेचा राज-उद्धव मेळाव्याला टोला

"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा" : उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २०

मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की राजकीय नौटंकी!

भाजपा नेत्यांनी उडवली ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची खिल्ली! मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या

संचमान्यतेमुळे राज्यातील ८८४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

कोकणातील ९९ शाळांनाही बसणार फटका मुंबई : शिक्षण विभागाने संचमान्यतेचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका