Wednesday, July 3, 2024
Homeमहत्वाची बातमीदेशमुखांनी हाच मुहूर्त का निवडला?

देशमुखांनी हाच मुहूर्त का निवडला?

सुधीर मुनगंटीवर यांचा सवाल

मुंबई : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कारवाईनंतर भाजप नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.सचिन वाझे हे महाराष्ट्र पोलीस आणि एसआईटीच्या ताब्यात आल्यावरच अनिल देशमुखांनी ईडीच्या समोर जाण्याचा मुहूर्त का काढला? असा सवाल त्यांनी केला आहे.

एक गृहमंत्री म्हणून ज्यांनी जबाबदारीचा निर्वाह केला, त्यांनी एक आदर्श प्रस्थापित करायला हवा होता. अनिल देशमुख नेहमी पोलीस अधिकाऱ्यांसोबत किंवा जनतेसोबत संवाद साधताना सांगायचे की पोलिसांनी एखादा खोटा गुन्हा दाखल केला तर त्या संदर्भात आपली बाजू मांडलीच पाहिजे. कायद्या तुमच्या बाजूने उभा आहे.

मग जे वाक्य अनिल देशमुख दुसऱ्यांना सांगायचे, आज असं अचानक काय झाले? त्याची दोनच कारणं असू शकतात. एक कारण, की अनिल देशमुख यांच्या हे लक्षात आलं की कोर्टातून देखील आपल्याला या संदर्भात अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही. दुसरा मुद्दा यामध्ये संपत्ती जी आहे, त्या संपत्तीवर टाच येत आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -