नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विमा दावा करण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. विम्याचा हप्ता तारखेवर न भरल्यास विमा दावा फेटाळला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने एका केसच्या सुनावणी दरम्यान म्हटले आहे. तसेच विमा पॉलिसीच्या अटींचा अर्थ लावताना कराराचे पुनर्लेखन करण्यास परवानगी नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सांगितले की, विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती काटेकोरपणे समजून घेतल्या पाहिजेत. तसेच विम्याच्या करारासाठी विमाधारकाचा पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे.
तक्रारदाराच्या पतीने जीवन सुरक्षा योजनेअंतर्गत १४ एप्रिल २०११ रोजी आयुर्विमा महामंडळाकडून जीवन विमा पॉलिसी घेतली होती. ज्या अंतर्गत महामंडळाकडून अपघात झाल्यास ३,७५,००० रुपये आणि मृत्यू झाल्यास अतिरिक्त ३,७५,००० रक्कम देण्याची हमी देण्यात आली होती.
मध्यप्रदेशात एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह आढळले लटकलेल्या अवस्थेत भोपाळ : दिल्लीत १ जुलै २०१८…
कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी ठाणे : अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचे लक्ष…
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे…
पावसाळी पर्यटन ठरतंय धोक्याचं... कोल्हापूर : पावसाळी पर्यटन (Monsoon trip) जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने…
नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम (Upendra Dwivedi) आता भारताचे नवे लष्करप्रमुख झाले…
भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पुणे : रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू…