‘हे’ तर बिघडे नवाब: अमृता फडणवीस

Share

मुंबई : नवाब मलिक यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना ‘हे’ तर बिघडे नवाब, असे सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांना ‘बिघडे नवाब’ असे उच्चारले. या बिघडे नवाबांच्या मागे कोण आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मी सामाजिक कार्यकर्ती आहे. माझ्याकडे जमीन-जुमला काहीही नाही. त्यामुळे आरोपांना घाबरत नाही. मी कुणावर निराधार आणि खोटे आरोप करत नाही. मात्र, माझ्या वाट्याला कुणी आले, तर त्याला सोडणार नाही, असेही अमृता यांनी ठणकावून सांगितले.

ईशा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे काही सेवक मुंबईतील नद्यांसंदर्भात भेटायला आले होते. त्यांच्यासोबत आम्ही रिव्हर मार्च नावाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाअंतर्गत मी मुंबईतील सर्व नद्यांना भेट दिली. यामध्ये मिठी, दहिसर, ओशिवरा या नद्यांचा समावेश होता. त्या नद्यांची परिस्थिती पाहून मला रडू कोसळलं, असं अमृता म्हणाल्या.

Recent Posts

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

46 minutes ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

1 hour ago

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

2 hours ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

3 hours ago

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

8 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

9 hours ago