कोस्टल रोड प्रकल्पाचे काम बंद पाडले


शिवसेनेविरोधात वरळीचे मच्छीमार आक्रमक




मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेचा, विशेषत: शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाला वरळीतील स्थानिक मच्छीमारांनी जोरदार विरोध केला आहे. कोणतीही मागणी मान्य न करत मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप करत शनिवारी मच्छीमारांनी भर समुद्रात जाऊन कोस्टल रोडचे काम बंद पाडले. या प्रकल्पाच्या विरोधात मच्छीमारांनी जोरदार निदर्शने केली.


कोस्टल रोड प्राधिकरणाने समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करण्यात अडचण येत आहे. तसेच या बार्जेसमुळे जाळ्यांचे देखील फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांनी समुद्रातील बार्जवर जाऊन काम बंद पाडले.


याआधी मच्छीमारांनी संयम दाखवत स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली होती. पण आता प्राधिकरणाच्या मनमनी कारभाराला चाप लावण्यासाठी स्थानिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोस्टल रोडचे काम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिक मच्छीमारांनी घेतली आहे.


मासेमारीला जाण्यासाठी समुद्रातील मार्गात असलेल्या दोन पिलरच्या दरम्यानचे अंतर २०० मीटर ठेवावे, अशी मच्छीमारांची मुख्य मागणी आहे. प्राधिकारणाने मात्रे हे अंतर ६० मीटर ठेवण्याचे ठरवले आहे. यामुळे दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणत्याच विभागाने स्वीकारली नसल्याच्या आरोप मच्छीमारांनी केला आहे.­ याबाबत आक्रमक होत मच्छीमारांनी भर समुद्रात बोटी नेत हे काम बंद पाडले. या आंदोलनामुळे वरळी कोळीवड्यातील वातावरण तापले असून परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहे.


आदित्य ठाकरेंवर टीका


संतप्त मच्छीमारांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे यांना पर्यावरणाचे काही माहिती आहे का? आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्हाला कोण एक दिवस पाहायला येत नाही. निवडून येतात आमच्या गावातून आणि मदत दुसरीकडे करतात. असे कसे चालेल.

Comments
Add Comment

खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार ६ लाख रुपयांची भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत

मुंबईतील राडारोडा प्रक्रिया केंद्राला अल्प प्रतिसाद, प्रशासनासोर ही आव्हाने

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) संकलित करणे, वाहून नेणे व

दादरच्या गजबजलेल्या डिसिल्व्हा रस्त्यावर फटाक्यांची मोठी दुकाने, स्थानिकांच्या मनात जुन्या दुर्घटनेची भिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त आता फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात झाली असून अशाप्रकारची दुकाने

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दीपावली सानुग्राह अनुदान जाहीर! मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्रथमच सानुग्रह अनुदानाचा लाभ! महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या

वडाळा सहकार नगरमधील भाडेकरुंना मिळणार दिलासा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आयुक्तांना 'या' सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वडाळा सहकार नगर येथील महापालिका मालकीच्या इमारतींमध्ये महापालिकेचे भाडेकरु असून त्यांना

बांधकामाच्या ठिकाणी होणाऱ्या वायू प्रदूषणावरील  नियंत्रणाबाबत  विचारमंथन,  झपाट्याने होणाऱ्या विकासासोबत काही आव्हाने मुंबई समोर

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगर वेगाने वाढत आहे. नवनवीन पायाभूत सुविधा प्रकल्प, गृहनिर्माण व वाहतूक सुविधा