कोस्टल रोड प्रकल्पाचे काम बंद पाडले


शिवसेनेविरोधात वरळीचे मच्छीमार आक्रमक




मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेचा, विशेषत: शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाला वरळीतील स्थानिक मच्छीमारांनी जोरदार विरोध केला आहे. कोणतीही मागणी मान्य न करत मनमानी पद्धतीने कोस्टल रोड प्राधिकरण काम करत असल्याचा आरोप करत शनिवारी मच्छीमारांनी भर समुद्रात जाऊन कोस्टल रोडचे काम बंद पाडले. या प्रकल्पाच्या विरोधात मच्छीमारांनी जोरदार निदर्शने केली.


कोस्टल रोड प्राधिकरणाने समुद्रात मासेमारी करण्याच्या ठिकाणी बार्जेस नांगरून ठेवल्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करण्यात अडचण येत आहे. तसेच या बार्जेसमुळे जाळ्यांचे देखील फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांनी समुद्रातील बार्जवर जाऊन काम बंद पाडले.


याआधी मच्छीमारांनी संयम दाखवत स्थानिक नेत्यांसोबत चर्चा केली होती. पण आता प्राधिकरणाच्या मनमनी कारभाराला चाप लावण्यासाठी स्थानिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोस्टल रोडचे काम सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिक मच्छीमारांनी घेतली आहे.


मासेमारीला जाण्यासाठी समुद्रातील मार्गात असलेल्या दोन पिलरच्या दरम्यानचे अंतर २०० मीटर ठेवावे, अशी मच्छीमारांची मुख्य मागणी आहे. प्राधिकारणाने मात्रे हे अंतर ६० मीटर ठेवण्याचे ठरवले आहे. यामुळे दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणत्याच विभागाने स्वीकारली नसल्याच्या आरोप मच्छीमारांनी केला आहे.­ याबाबत आक्रमक होत मच्छीमारांनी भर समुद्रात बोटी नेत हे काम बंद पाडले. या आंदोलनामुळे वरळी कोळीवड्यातील वातावरण तापले असून परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहे.


आदित्य ठाकरेंवर टीका


संतप्त मच्छीमारांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे यांना पर्यावरणाचे काही माहिती आहे का? आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्हाला कोण एक दिवस पाहायला येत नाही. निवडून येतात आमच्या गावातून आणि मदत दुसरीकडे करतात. असे कसे चालेल.

Comments
Add Comment

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची

नियम व अटींची पूर्तता केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी मिळणार; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील गुंठेवारी नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुंठेवारी विकास नियमित

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल

महाराष्ट्रात गॅस, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही 

 इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष समित्यांची स्थापना; रिफायनरींकडून उत्पादन वाढवले मुंबई : इराण

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :