विजय तीन, मॅचविनर पाच


सलग तिसऱ्या विजयासह पाकिस्तानची सेेमीफायनल नक्की




दुबई (वृत्तसंस्था): सुपर १२ फेरीमध्ये (ग्रुप २) अफगाणिस्तानला हरवत विजयाची हॅट्रिक नोंदवतानाच पाकिस्तानने आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेची उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सलग तीन विजय मिळवणारा तो पहिला संघ आहे. तीन
विजयांत पाच मॅचविनर हे पाकिस्तानच्या सलग विजयांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.


कर्णधार बाबर आझमच्या (५१) अर्धशतकानंतर आसिफ अलीने (नाबाद २५) एकाच षटकात मारलेल्या चार षटकारांमुळे पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानचा पाच विकेट आणि सहा चेंडू राखून पराभव केला. अफगाणिस्तानचे १४८ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १९ षटकांत पाच विकेटच्या बदल्यात पार केले. आझम आणि आसिफपूर्वी, डावखुरा फिरकीपटू इमाद वासिमने प्रभावी मारा करताना प्रतिस्पर्ध्यांना
१४८ धावांमध्ये रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.


पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या आधी, न्यूझीलंड आणि परंपरागत प्रतिस्पर्धी भारतावर मात केली आहे. किवींविरुद्ध मध्यमगती गोलंदाज हॅरिस रौफ आणि मोहम्मद रिझवान चमकला. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने भारताची दाणादाण उडवली. त्यानंतर कर्णधार बाबरने मोहम्मद रिझवानसह प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पूर्ण केले.


बाबरने टाकले कोहलीला मागे


टी-ट्वेन्टी प्रकारात झटपट एक हजार धावा करणारा कर्णधार पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझमने सातत्य राखताना आणखी एक अर्धशतक झळकावत टी-ट्वेन्टी प्रकारात कर्णधार म्हणून एक हजार धावा पूर्ण केल्या. त्याने २६ डावांमध्ये ही करामत साधली. बाबरने भारताचा कर्णधार विराट कोहलीला (३० डाव) मागे टाकले. या दोघांसह दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिस (३१ डाव), ऑस्ट्रेलियाचा अॅरोन फिंच (३२ डाव) तसेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने (३६ डाव) कर्णधार म्हणून एक हजार धावा पूर्ण केलेल्या आहेत.

Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने