राणेंच्या पुढाकाराने धावणार वसई-सावंतवाडी रेल्वे

  39

वसई (विशेष प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने आता लवकरच वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारतीय जनता पार्टी वसई-विरार जिल्हा उपाध्यक्ष विश्वास सावंत यांच्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश येणार आहे. विश्वास सावंत यांनी माजी खासदार निलेश राणे यांना वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू करण्याचे निवेदन दिले होते.


याबाबत दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासंदर्भात सांगितले. त्यानुसार रावसाहेब दानवे यांनी नारायण राणे व निलेश राणे यांना आश्वासन दिले असून लवकरच वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू होणार आहे.


वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणातील लोक राहत असून त्यांच्या सोयीसाठी वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे विश्वास सावंत यांनी एका निवेदनानुसार केली होती.


विश्वास सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश येणार आहे. मुंबईतील घरांच्या किमती वाढल्यामुळे कोकणी माणूस मोठ्या प्रमाणात वसई, विरार, नालासोपारा या भागात राहण्यासाठी आला आहे. त्यांना कोकणात जाण्यासाठी दादर किंवा दिव्याला जावे लागत आहे. गुजरातमधून येणाऱ्या काही गाड्या आहेत. मात्र त्यांची आरक्षणे मिळत नाहीत. तेव्हा आपण माजी खासदार आहात, एखादी रेल्वे तेथील गरजू लोकांसाठी सोडायची असेल तर प्रयत्न केले पाहिजेत, हे आपणास माहीत आहे, असे विश्वास सावंत यांनी निलेश राणे यांना भेटून सांगितले. त्यानुसार निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू करण्याबाबतची विनंती केली.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण