टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेतील बांगलादेशची वाट बिकट

अबुधाबी (वृत्तसंस्था) : फॉर्मात असलेल्या इंग्लंडने बांगलादेशवर ८ विकेट आणि ३५ चेंडू राखून विजय मिळवत आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये सुपर-१२ फेरीमध्ये सलग दुसरा नोंदवला. दुसरीकडे, सलग दुसऱ्या पराभवामुळे बांगलादेशचा पुढील प्रवास बिकट झाला आहे.


बांगलादेशचे १२५ धावांचे आव्हान इंग्लंडने २ विकेटच्या बदल्यात १४.१ षटकांत पार केले. त्यात सलामीवीर जेसन रॉयचे मोठे योगदान राहिले. त्याने ३८ चेंडूंत ६१ धावा केल्या. त्यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. रॉयने वैयक्तिक खेळ उंचावताना जोस बटलरसह (१८ चेंडूंत १९ धावा) सलामीसाठी ३९ धावा जोडल्या. त्यानंतर डॅविन मालनसह (२५ चेंडूंत नाबाद २८ धावा) दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावा जोडताना विजयाचे सोपस्कार पार पाडले.


त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणऱ्या बांगलादेशला २० षटकांत ९ बाद १२४ धावांमध्ये रोखण्यात इंग्लंडला यश आले. त्यांच्याकडून मुशफिकुर रहिमने सर्वाधिक २९ धावा केल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सने तीन विकेट घेत प्रभाव पाडला. त्याला ऑफस्पिनर मोईन अली तसेच लियाम लिव्हिंगस्टोनची (प्रत्येकी २ विकेट) चांगली साथ लाभली.


बांगलादेशला तिसऱ्या षटकात दोन धक्के बसले. मोइन अलीच्या सलग दोन चेंडूंवर दोन गडी बाद झाले. लिटन दास आणि मोहम्मद नइम बाद झाल्याने संघावर दडपण आलं. लिटनने ८ चेंडूंत ९ तर मोहम्मद नइमने ७ चेंडूंत धावा केल्या. यानंतर मैदानात आलेला शाकीब अल हसनही तग धरू शकला नाही. ख्रिस व्होक्सच्या गोलंदाजीवर अदिल राशीदने त्याचा झेल घेतला.


संघाची अवस्था बिकट असताना मुशफिकुर आणि महमुद्दुल्लाह यांनी डाव सावरला. मात्र दोघांना मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आलं. मुशफिकुर रहिम २९ धावांवर असताना लिव्हिंगस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानतर लगेचच होसैन ५ धावा करून तंबूत परतला. महमुद्दुल्ला १९, नुरुल हसन १६, महेदी हसन ११, मुस्तफिझुर रहमान ० धावा करून बाद झाले.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे