पालघर (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारातील गर्दी दिवसेंदिवस वाढत असून लोकांमध्ये असलेली कोरोनाची भीती पूर्णपणे नाहीशी झाली आहे. कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत अनेक बाजार गर्दीने फुलून गेले आहेत. त्यामुळे प्रशासन चिंतेत सापडले आहे.
दिवाळी उंबरठ्यावर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दैनंदिन बाजार, आठवडे बाजार, शॉपिंग सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. कपडे, आकाश कंदील, रांगोळी, पणत्या, दिवाळी फराळाचे साहित्य, फटाके, मिणमिणत्या लाईटची तोरणे अशा वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत.
गेल्या वर्षी ऐन दिवाळीत कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यामुळे दिवाळी सण साजरा करण्यावर बंधने आली होती. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे हा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासूनच बाजारात गर्दी होऊ लागली आहे; परंतु, नागरिक मात्र कोरोनाचे कोणतेही नियम पाळत नसल्यामुळे प्रशासन चिंतेत सापडले आहे.
मास्क न लावणे व सामाजिक अंतर न राखणे अशा प्रकारांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…