जयंत पाटलांच्या दौऱ्यातून निष्पन्न काय?

Share

दीपक मोहिते

पालघर : शुक्रवारी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याचा उद्देश होता की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे. त्यामध्ये जलसंपदा विभागाचा कोणत्याही विषयाचा समावेश नव्हता. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याचे वर्णन ‘ते आले, मूठभर कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला व पुढच्या कार्यक्रमास निघून गेले,’ असे केल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

दिवसभर ते जिल्ह्यात होते. या दरम्यान त्यांनी वाडा तालुक्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी शेताच्या बंधावर जाऊन संवाद साधला असता तर जिल्हावासीयांची त्यांच्या पक्षाला नक्कीच आशीर्वाद मिळाले असते. पण शेतकरी ‘किस झाडकी पत्ती’ अशा वृत्तीने वावरणाऱ्या नेत्यांपेक्षा जयंत पाटीलही वेगळे नाहीत, हे काल अनुभवायला मिळाले.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट आहे. संघटनात्मकदृष्ट्या पक्ष कमकुवत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड विधानसभा त्यांनी जिंकली होती. कारण समोरचा उमेदवार प्रभावी नव्हता. माजी आमदार व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हाविकासाबाबत अक्षम्य दुर्लक्ष केले. त्याचा फटका त्यांच्या मुलाला या निवडणुकीत बसला व राष्ट्रवादी काँग्रेसला अनपेक्षितपणे विजयाची लॉटरी लागली. राष्ट्रवादीचा हा विजय नकारात्मक होता.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभावी कामगिरी करता आली नाही. डहाणू, विक्रमगड व मोखाडा या तीन तालुक्यांत थोडेफार अस्तित्व असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वसई, पालघर, तलासरी व वाडा तालुक्यांत अस्तित्व अत्यंत नगण्य आहे. त्यामुळेच जयंत पाटलांना शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणे महत्त्वाचे वाटले असावे. परिणामी शासकीय खर्चाने झालेल्या पक्षीय दौऱ्यातून काय निष्पन्न होते, ते लवकरच होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

4 hours ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

6 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

6 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

9 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

9 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

9 hours ago