नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लशींच्या भारतीय उत्पादकांची भेट घेतली. भारताने १०० कोटी लसीकरण करून महत्वाचा टप्पा पार केला. या यशोगाथेत या लस उत्पादकांनी मोठी भूमिका बजावल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या मेहनतीचे आणि साथीच्या काळात दिलेल्या आत्मविश्वासाचे कौतुक मोदींनी केले. जागतिक स्तराला सुसंगत अशा वैद्यकीय पद्धतींमध्ये सुधारणा करण्याची ही एक संधी आहे, असे ते म्हणाले.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरिज्, झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जेनोव्हा बायोफार्मा आणि पॅनासिया बायोटेक या सात लस निर्मात्यांचे प्रतिनिधी तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हेही यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदार पूनावाला आणि सायरस पूनावाला यांनी सरकारने आणलेल्या नियामक सुधारणांची प्रशंसा केली. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, सज्ज होण्यासाठी लस उत्पादकांनी सतत एकत्र काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…