लोकलमध्ये गर्दी वाढली!

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल लोकडाऊनमध्ये गेले कित्येक महिने बंद होती, त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र आता दीड वर्षांनंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकलची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे.


गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद होता. मात्र लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना आता लोकल प्रवास सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकलमधील गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर ६० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. कोरोनापूर्व रोज मध्य आणि पश्चिम मार्गावर ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. त्याप्रमाणे सध्याची लोकल प्रवासाची संख्या ८० टक्क्यांवर पोहोचली आहे.


सध्या मध्य रेल्वेवर ३२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत, तर पश्चिम रेल्वेवर २७ ते ३० लाख प्रवासी प्रवास करत आहेत. लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या सुमारे २२ लाख प्रवाशांनी मासिक पास घेतले आहेत. यामुळे ही गर्दी सध्या वाढत आहे, तर काहीजण ज्यांनी केवळ एकच लस घेतली असून दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.


दरम्यान लोकलमध्ये गर्दी वाढत असली तरी कोरोना प्रतिबंधक नियम पाळायचे आहेत. मात्र गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंन कसे पाळले जाणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना असला तरी मास्क वापरणे बंधनकारक असून, न वापरल्यास दंड आकारला जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून