लोकलमध्ये गर्दी वाढली!

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल लोकडाऊनमध्ये गेले कित्येक महिने बंद होती, त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र आता दीड वर्षांनंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकलची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे.


गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवास बंद होता. मात्र लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना आता लोकल प्रवास सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकलमधील गर्दीचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर ६० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. कोरोनापूर्व रोज मध्य आणि पश्चिम मार्गावर ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. त्याप्रमाणे सध्याची लोकल प्रवासाची संख्या ८० टक्क्यांवर पोहोचली आहे.


सध्या मध्य रेल्वेवर ३२ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत, तर पश्चिम रेल्वेवर २७ ते ३० लाख प्रवासी प्रवास करत आहेत. लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या सुमारे २२ लाख प्रवाशांनी मासिक पास घेतले आहेत. यामुळे ही गर्दी सध्या वाढत आहे, तर काहीजण ज्यांनी केवळ एकच लस घेतली असून दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.


दरम्यान लोकलमध्ये गर्दी वाढत असली तरी कोरोना प्रतिबंधक नियम पाळायचे आहेत. मात्र गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंन कसे पाळले जाणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना असला तरी मास्क वापरणे बंधनकारक असून, न वापरल्यास दंड आकारला जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात