नाट्यगृहांत रसिकांचा उदंड प्रतिसाद; सिनेमागृहांकडे पाठ

वैजयंती कुलकर्णी - आपटे


मुंबई : गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून बंद असलेली नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे शुक्रवारी पुन्हा उघडल्यामुळे मनोरंजन क्षेत्रात पुनश्च हरिओम झाला आहे. अनेक नाट्यगृहात आज तिसरी घंटा झाली आणि नाटकांचा पडदा उघडला. सरकारने सध्या ५० टक्के आसन क्षमतेमध्येही नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळेच आज मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि अनेक भागात नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे रसिक प्रेक्षकांसाठी खुली झाली आहेत.


पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नटराजाची आणि रंगमंचाची पूजा होऊन संस्कृतिक कार्यक्रम सादर झाले, तर मुंबईतील रंगशारदा नाट्यगृहात भाजपचे आमदार आशीष शेलार ह्यांच्या पुढाकाराने रंगमंचाची पूजा करून अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ ह्या नाटकाचा प्रयोग झाला. तर, परळ येथील दामोदर नाट्यगृहात सुप्रसिद्ध गायक अरविंद पिळगावकर ह्यांच्या उपस्थितीत नाट्यसंगीताचा कार्यक्रम झाला.


नाट्यगृहांप्रमाणे चित्रपट गृहांचाही पडदा उघडला. पण तिथे मात्र प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि अनेक चित्रपटगृहांमध्ये आजचे खेळ रद्द करावे लागले.

मुंबईतही रंगशारदा नाट्यगृहात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ ह्या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. ‘रंगशारदा’ या नावातच रंग आणि शारदा आहे. रंगमंचाचे नाव आहे, नाटकार विद्याधर गोखले रंगमंचावरून आज पुन्हा तिसरी घंटा वाजवताना मला गहिवरून आले आहे, अशा शब्दात ‘मराठीबाणा’कार अशोक हांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


रंगभूमीवरील तंत्रज्ञ व पडद्यामागच्या कलावंताना कोरोना काळात मदत करणाऱ्या अशोक हांडे, प्रशांत दामले, बाबू राणे,  प्रीती जामकर, रत्नाकर जगताप, हरी पाटणकर यांचा आशीष शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात यावेळी प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग रंगला.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना