बेजबाबदार मुंबईकर

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोनाचा प्रसार असतानाही मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिका, रेल्वे आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून ७६ कोटींहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ३६,९०,२३४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई एप्रिल २०२० ते ते १९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत करण्यात आली आहे.


मुंबई कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका कमी असला तरी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अद्यापही मुंबईत सार्वजनिक ठिकाणी वावरताना किंवा रेल्वेत प्रवास करताना काही लोक मास्क वापरत नाहीत. अशा वेळी महापालिका किंवा पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. दरम्यान केवळ मुंबई महानगरपालिकेकडून ३०,३८,६०० जणांवर कारवाई करण्यात आली असून ६३,६५,९६,२०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून ६,२७,७४३ जणांवर कारवाई करण्यात आली असून १२,५५,४८,६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेकडूनही कारवाई करण्यात आली असून २३,८९१ जणांवर कारवाई केली असून यातून ५०,३९,२०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.


सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचे आवाहन पालिकेकडून वारंवार करण्यात येते. तरीही अनेकजण सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरताना दिसतात.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात