बेजबाबदार मुंबईकर

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोनाचा प्रसार असतानाही मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिका, रेल्वे आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून ७६ कोटींहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ३६,९०,२३४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई एप्रिल २०२० ते ते १९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत करण्यात आली आहे.

मुंबई कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका कमी असला तरी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अद्यापही मुंबईत सार्वजनिक ठिकाणी वावरताना किंवा रेल्वेत प्रवास करताना काही लोक मास्क वापरत नाहीत. अशा वेळी महापालिका किंवा पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. दरम्यान केवळ मुंबई महानगरपालिकेकडून ३०,३८,६०० जणांवर कारवाई करण्यात आली असून ६३,६५,९६,२०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून ६,२७,७४३ जणांवर कारवाई करण्यात आली असून १२,५५,४८,६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेकडूनही कारवाई करण्यात आली असून २३,८९१ जणांवर कारवाई केली असून यातून ५०,३९,२०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचे आवाहन पालिकेकडून वारंवार करण्यात येते. तरीही अनेकजण सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरताना दिसतात.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

43 mins ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

1 hour ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

2 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

3 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

3 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

4 hours ago