मुंबईत फटाक्यांचा वापर पाच वर्षांत निम्म्यावर

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाऊंडेशनकडून ३० प्रकारच्या फटाक्यांची चाचणी गुरुवारी आरसीएफ मैदान येथे घेण्यात आली. यात १५ प्रकारचे नियमित फटाके तर १५ प्रकारचे ग्रीन फटाक्यांचा समावेश होता. यावेळी देखील आवाजाची पातळी कमी असल्याचे नोंद झाली आहे. दरम्यान गेल्या पाच वर्षांत जनजागृतीमुळे मुंबईतील फटाके वाजवण्याचे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी सांगितले.


गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाऊंडेशनकडून फटाक्यांची आवाजाची पातळी तपासली जाते. २०१० या वर्षी १३०.६ डेसिबल एवढी उच्च पातळी फटाक्यांच्या आवाजाने ओलांडली असल्याची नोंद करण्याता आली. ही नोंद जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा म्हणजे १२५ डेसिबलहून अधिक होती.


मात्र नंतर फटाक्यांच्या आवाजाची पातळी कमी नोंद केली गेली असल्याचे सांगण्यात आले. २०२० पासून तर सरकारने ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली. हे ग्रीन फटाके निरी संस्थेने विकसित केले असून आवाज आणि हवेतील प्रदूषण कमी करणारी आहेत. त्यावर तशी माहिती असते. अद्याप सरकारकडून कोणतीही घोषणा केली नसली तरीही ग्रीन फटाक्यांसह सर्व प्रकारचे फटाके बाजारात उपलब्ध आहेत.


दरम्यान कोरोना निर्बंधात शिथिलता आणल्यामुळे दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष ठेऊन आहे. तसेच फटाक्यांच्या विक्रीबाबत नवे निर्देशही जाहीर होण्याची शक्यता असल्याचे वर्तविण्यात येत आहे.

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :