विद्युत मीटर नसतानाही महिलेला दिले वीज बिल

वाडा (वार्ताहर) : वाडा महावितरणचा सध्या मनमानी कारभार सुरू असून ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज बिले देणे, विजेचा खेळखंडोबा व विद्युत मीटर नसतानाही बिले आकारणे असे अनेक प्रकार वाढीस लागले आहेत. तालुक्यातील रायसल येथील एका महिलेच्या घरात विद्युत मीटर नसतानाही तिला विजेचे बिल देण्यात आल्याने सदर महिलेने तक्रार केली आहे.



तालुक्यातील रायसल या गावात रेश्मा गंगाराम गवारी ही महिला राहात असून सदर महिलेने नवीन मीटर घेण्यासाठी महावितरणकडे ११६५ रुपये भरले आहेत. मात्र, आजतागायत तिच्या घरात विद्युत मीटर बसवण्यात आला नाही. तथापि, असे असतानाही रेश्मा यांना जुलै महिन्याचे ६८ युनिट पडल्याचे दाखवून १८७० रुपये वीज बिल देण्यात आले आहे. मीटर बसवलेला नसतानाही वीज बिल आल्याने रेश्मा यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता वाडा यांना तक्रार देऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा रेश्मा गवारी यांनी महावितरणला दिला आहे. यासंदर्भात वाडा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची चौकशी करतो, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल

खरडलेल्या शेतजमिनींसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, मोफत !

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ