विद्युत मीटर नसतानाही महिलेला दिले वीज बिल

वाडा (वार्ताहर) : वाडा महावितरणचा सध्या मनमानी कारभार सुरू असून ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज बिले देणे, विजेचा खेळखंडोबा व विद्युत मीटर नसतानाही बिले आकारणे असे अनेक प्रकार वाढीस लागले आहेत. तालुक्यातील रायसल येथील एका महिलेच्या घरात विद्युत मीटर नसतानाही तिला विजेचे बिल देण्यात आल्याने सदर महिलेने तक्रार केली आहे.



तालुक्यातील रायसल या गावात रेश्मा गंगाराम गवारी ही महिला राहात असून सदर महिलेने नवीन मीटर घेण्यासाठी महावितरणकडे ११६५ रुपये भरले आहेत. मात्र, आजतागायत तिच्या घरात विद्युत मीटर बसवण्यात आला नाही. तथापि, असे असतानाही रेश्मा यांना जुलै महिन्याचे ६८ युनिट पडल्याचे दाखवून १८७० रुपये वीज बिल देण्यात आले आहे. मीटर बसवलेला नसतानाही वीज बिल आल्याने रेश्मा यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी उपकार्यकारी अभियंता वाडा यांना तक्रार देऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, कारवाई न केल्यास बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा रेश्मा गवारी यांनी महावितरणला दिला आहे. यासंदर्भात वाडा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची चौकशी करतो, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC : आयुक्त पोहोचले कांदिवलीत महापालिका अधिकाऱ्यांना धीर द्यायला

- पिझ्झा दुकान आणि दुचाकी दुकानांवर कारवाईचे दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) कांदिवली परिसरातील अनधिकृत

गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी वन्यजीव संवर्धन योजनेची अंमलबजावणी; वन विभागाकडे २० कोटी रुपये करणार जमा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत संजय

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्यास होणार १९ कोटींचा खर्च

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन

मुंबई: आयसीसीच्या टि ट्वेंटी विश्वचषकाच्या सलग दोन स्पर्धेत विश्वचषकांवर नाव कोरण्याची भारतीय संघाची ऐतिहासिक

'भारतीय क्रिकेट संघाचा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद'

मुंबई : टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट

न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले टीम इंडियाचे अभिनंदन

मुंबई : अहमदाबाद येथे झालेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६