नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणि निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
या निर्णयानुसार वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मुलभूत वेतन, निवृत्तीवेतनावर सध्या २८ टक्के दराने दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याव्यतिरिक्त हा अधिकचा ३ टक्के भत्ता असेल आणि तो १ जुलै २०२१ पासून देय असणार आहे.
सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीवर आधारित स्वीकृत सूत्रांनुसार ही वाढ देण्यात आली आहे. महागाई भत्ता आणि दिलासा निधीपोटी देशाच्या तिजोरीवर दर वर्षी ९,४८८.७० कोटी रुपयांचा बोजा पडणार असून सुमारे ४७ लाख १४ हजार केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६८ लाख ६२ हजार निवृत्तीवेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…