मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात विरोधकांवर केलेल्या टीकेचा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात विचारांचे सोनं लुटायचे. मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्र लुटायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
ते मुख्यमंत्र्यांसारखे कधीच बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या अंगी असावे लागतात, तसे गुण त्यांच्यामध्ये नाहीत. ते वायफळ बडबड करतात. त्यांच्या विचारांची मर्यादाच तेवढी आहे. त्यामुळे ते दुसरे काही बोलू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
दसरा मेळाव्यात पक्षप्रमुखाचे भाषण होते की रडगाणं होते? नेहमीची किर-किर, आदळ-आपट पण निष्पन्न शून्य. म्हणे मी राजकारणातून बाजूला झालो असतो! बरे झाले असते महाराष्ट्र वाचला असता, असे सांगून, चायनामध्ये बनवलेला पक्षप्रमुख वाटतो, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…