मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात विरोधकांवर केलेल्या टीकेचा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात विचारांचे सोनं लुटायचे. मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्र लुटायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
ते मुख्यमंत्र्यांसारखे कधीच बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या अंगी असावे लागतात, तसे गुण त्यांच्यामध्ये नाहीत. ते वायफळ बडबड करतात. त्यांच्या विचारांची मर्यादाच तेवढी आहे. त्यामुळे ते दुसरे काही बोलू शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
दसरा मेळाव्यात पक्षप्रमुखाचे भाषण होते की रडगाणं होते? नेहमीची किर-किर, आदळ-आपट पण निष्पन्न शून्य. म्हणे मी राजकारणातून बाजूला झालो असतो! बरे झाले असते महाराष्ट्र वाचला असता, असे सांगून, चायनामध्ये बनवलेला पक्षप्रमुख वाटतो, असेही निलेश राणे यांनी म्हटले आहे.
मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्या ११ जागांसाठी १२…
मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…
हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…
आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…
परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…
हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…