१८ वर्षाखालील सर्वांना तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार रेल्वे तिकीट

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. परंतु कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही मुंबईकरांना १४ दिवसांनी लोकलचा केवळ मासिक पास मिळत होता. मात्र, आता मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमधून प्रवास करण्यासाठी १८ वर्षाखालील तसेच दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकलचे तिकीट दिले जाणार आहे. प्रवाशांना तिकीट खिडकीवरूनच तिकीट खरेदी करावे लागेल. जेटीबीएस, एटीव्हीएम कुपन्स आणि यूटीएस अॅपवर तिकीट उपलब्ध होणार नाही.


शाळा, महाविद्यालये सुरू होणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रेल्वेचे तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू झाल्यामुळे दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे लसीकरणाला पात्र नसलेल्या १८ वर्षाखालील मुलांना रेल्वे तिकीट मिळणार असून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रकृती अस्वास्थामुळे ज्यांना कोरोना लस घेण्याची परवानगी नाही त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवून तिकिट घेता येणार आहे.

Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती