ठाण्यात दोन दिवसांपासून कचरा उचलण्याचे काम बंद

Share

ठाणे (वार्ताहर) : ऐन नवरात्रीच्या काळात शहरातील नौपाडा व उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीत घंटागाड्यांकडून कचरा उचलणे बंद करण्यात आले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र बंदमध्ये अत्यावश्यक सेवा असलेल्या घंटागाड्याही बंद ठेवण्याचा प्रताप करण्यात आला. तसेच, दुसऱ्या दिवशी ठेकेदार व प्रशासनाच्या वादातून घंटागाड्या बंद असल्यामुळे सोसायट्यांमध्ये व रस्त्यावर कचरा साचला आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा पडला आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराकडे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले असून महापालिका प्रशासनाने दखल न घेतल्यास महापालिका मुख्यालयात कचरा टाकण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या नौपाडा व उथळसर प्रभाग समितीतील इमारतींमधील कचरा उचलण्याचे काम घंटागाडी कंत्राटदारावर सोपवण्यात आले आहे. मात्र, घंटागाडीच्या ठेकेदाराची मुदत संपली असून नवा करारही करण्यात आला नाही. त्यामुळे ठेकेदार व प्रशासनामध्ये वाद सुरू आहे. दुसरीकडे, कचरा उचलणेही अत्यावश्यक सेवा आहे. मात्र, वाद सोडवण्याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यातच महाराष्ट्र बंदचे निमित्त साधत घंटागाड्या बंद ठेवण्यात आल्या. दरम्यान, मंगळवारीही घंटागाड्याच बंदच होत्या.

परिणामी नौपाडा व उथळसर परिसरातील शेकडो इमारतींमध्ये कचऱ्याचे डबे भरून पडले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांतच सोसायट्यांमध्ये दुर्गंधी पसरू लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरही कचरा पडून आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असल्याकडे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले.

घंटागाडी ठेकेदाराबरोबरील वाद सोडवण्यासह कचरा उचलण्याची सेवा बंद होऊ नये, यासाठी कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्यकता होती. मात्र, त्याकडे महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकाराची गंभीर दखल न घेतल्यास महापालिका मुख्यालयात कचरा टाकण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

घंटागाडी संपाला जबाबदार अधिकारी कोण?

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. मात्र, घंटागाड्यांनीही संपात सहभाग घेतल्यामुळे हजारो ठाणेकरांना दुर्गंधीत राहावे लागत आहे. संप उत्तर प्रदेशसाठी, अन् फटका ठाणेकरांना अशी स्थिती निर्माण झाली, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली. अत्यावश्यक घंटागाडी सेवेच्या बंदला महापालिकेतील जबाबदार अधिकारी कोण, असा सवाल नारायण पवार यांनी विचारला आहे.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

14 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

1 hour ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago