धोनीचा दिल्लीविरुद्ध अनुभव कामी आला

  44

सुनील सकपाळ


मुंबई : माजी विजेता चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सना हरवून आयपीएल २०२१ हंगामाच्या अंतिम फेरीत धडक मारली. बाद फेरीमध्ये खेळण्याचा सर्वाधिक अनुभव तसेच सीनियर क्रिकेटपटूंचा मोक्याच्या क्षणी उंचावलेला खेळ हे धोनी आणि सहकाऱ्यांच्या नवव्या फायनल प्रवेशाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.


प्रतिस्पर्धी चेन्नईसमोरील १७३ धावांचे विजयी लक्ष्य फार मोठे नसले तरी छोटेही नव्हते. फाफ डु प्लेसिस आल्यापावली परतला तरी सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (५० चेंडूंत ७० धावा) युएईतील उर्वरित लेगमधील आठ सामन्यांतील दुसरे अर्धशतक ठोकताना सातत्य राखले. केवळ तिसरा सामना खेळणाऱ्या अनुभवी रॉबिन उथप्पाची (४४ चेंडूंत ६३ धावा) मोक्याच्या क्षणी बॅट तळपली. मागील दोन सामन्यांत मिळून केवळ २१ धावा करणाऱ्या उथप्पाने अनुभव पणाला लावताना उर्वरित हंगामातील वैयक्तिक हाफ सेंच्युरी मारली. शिवाय ऋतुराजसह दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना डावाची पायाभरणी केली.


उथप्पा बाद झाल्यानंतर अष्टपैलू शार्दूल ठाकूरला प्रमोशन देण्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा प्रयत्न फसला. तो खातेही उघडू शकला नाही. अंबाती रायडूही (१) आल्यापावली परतला. त्यातच १९व्या षटकात ऋतुराज बाद झाला. मध्यमगती अवेश खानने त्याला पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यानंतर ११ चेंडूंत २४ धावा असताना अष्टपैलू रवींद्र जडेजा ऐवजी स्वत: बॅटिंगला येत धोनीने त्याचे काम चोख पार पाडले. धोनी आणि मोईन अलीच्या तुलनेत अवेश अननुभवी आहे. त्यामुळे त्याचे काहीच चालले नाही. त्यातच शेवटच्या षटकात कॅगिसो रबाडा ऐवजी सॅम करनला खेळून काढण्याचा धोनीला फायदा झाला. यावेळी करनच्या चेहऱ्यावर टेन्शन जाणवत होते. त्याचा फायदा धोनीने उठवला. सलग दोन चौकारांनंतर करन हतबल ठरला.


दिल्लीकडून मुंबईकर पृथ्वी शॉ (३४ चेंडूंत ६० धावा), कर्णधार रिषभ पंत (३५ चेंडूंत नाबाद ५१ धावा) तसेच अष्टपैलू शिमरॉन हेटमायरने (२४ चेंडूंत ३७ धावा) फटकेबाजी केली. तसेच ५ बाद १७२ धावांची मजल मारली तरी तुलनेत १५-२० धावा कमी पडल्या. टी-ट्वेन्टी लढतीत काहीही होऊ शकते. त्यातच आयपीएलची प्ले-ऑफ फेरी आणि क्वॉलिफायर १ सामना म्हटल्यानंतर प्रत्येक संघ विजयाचाच विचार करणार, हे नक्की असते. तुलनेत बादफेरीत खेळण्याचा अनुभव कमी असूनही रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने चांगले आव्हान उभे केले. मात्र, तुमच्या काही फलंदाजांनी फटकेबाजी केली तर आम्हीही कमी नाही, हे चेन्नईच्या बॅटर्सनी दाखवून दिले.


क्वॉलिफायर १मधील चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतरही दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान अबाधित आहे. त्यांना आणखी एक सामना (क्वॉलिफायर २) खेळायला मिळेल. त्यात त्यांनी बाजी मारली तर फायनलमध्ये पुन्हा धोनीची टीम समोर असेल. मात्र, पुढील सामन्यात उतरण्यापूर्वी रिषभ पंत आणि सहकाऱ्यांना पहिल्या लढतीतील चुका सुधाराव्या लागतील.



बाप बाप होता है…


दिल्ली विरुद्ध चेन्नई लढतीत रिषभ पंत आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाची कसोटी लागली. दोघांनी फलंदाजीत मोलाचे योगदान दिले. मात्र, शेवटच्या षटकांत गोलंदाजांचा अचूक वापर करण्यात पंतला अपयश आले. १९व्या षटकात अवेश खानकडे चेंडू सोपवण्याचा त्याचा निर्णय चुकला. त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला गोलंदाजीसाठी आणण्याची गरज होती. सलामीवीर ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाऐवजी धोनी स्वत: फलंदाजीला आला. त्याला स्वत:वर विश्वास होता आणि आहे. त्यामुळे बेस्ट फिनिशर कायम बेस्ट असतो, हे धोनीने दाखवून दिले. तसेच कुशल नेतृत्वाची झलकही पेश केली.





Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला