१०० दिव्यांग लाभार्थींना मिळाले कृत्रिम हात

Share

मुंबई : ग्रँड मराठा फाउंडेशन आणि इनालि फाउंडेशनच्या माध्यमातून १६ ते ६० वर्षे या वयोगटातील १०० दिव्यांग लाभार्थींना कृत्रिम हात मोफत पुरविण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिकदृष्टया स्वतंत्र व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. रोहित शेलटकर (संस्थापक, जीएमएफ), माधवी शेलटकर (विश्वस्त, जीएमएफ) आणि प्रशांत गाडे (संस्थापक, इनालि फाउंडेशन) यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाविषयी माहिती देताना चित्रपट निर्माते आणि ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलटकर म्हणाले, कृत्रिम हातामुळे लाभार्थी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वावलंबी आयुष्य जगू शकतात. मर्यादित आर्थिक स्रोत असलेल्या शारीरिकदृष्ट्या दिव्यांगांनी पुढे यावे आणि फाउंडेशनशी जोडले जाऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रँड मराठा फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. तसेच ‘गरजूंचे सबळीकरण’ या कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी दात्यांनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी http://grandmaratha.org/ या वेबसाइटला भेट द्यावी.

Recent Posts

Suresh Raina : क्रिकेटर सुरेश रैनाच्या भावासह आणखी एकाचा रस्ते अपघातात मृत्यू

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत केला गुन्हा दाखल शिमला : भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर…

2 mins ago

Instagram new policy : ओरिजीनल कंटेंट क्रिएटर्सना इन्स्टाग्रामकडून खुशखबर!

कंटेंट रिपोस्ट करणार्‍यांना बसणार आळा मुंबई : अनेक लोकांपर्यंत झटक्यात पोहोचण्याचं इन्स्टाग्राम (Instagram) हे फार…

60 mins ago

Salman Khan Firing case : सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या अनुज थापनची आत्महत्या नव्हे तर हत्या?

कुटुंबियांच्या दाव्याने उडाली खळबळ मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराजवळ १४ एप्रिल…

2 hours ago

नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाह आज रत्नागिरीत

जवाहर मैदानावर दुपारी १ वाजता होणार जाहीर सभा रत्नागिरी : मतदानाला आता अवघे काही दिवसच…

9 hours ago

नाशिकमध्ये महायुती करणार आज शक्तीप्रदर्शन

डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे करणार अर्ज दाखल नाशिक : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक…

10 hours ago

मराठी पाट्या लावण्यासाठी सक्ती का करावी लागते?

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची १९६० साली निर्मिती झाली. मुंबई टिकविण्यासाठी मराठी माणसांनी रक्त सांडले. वर्षामागून वर्षे…

11 hours ago