Saturday, April 20, 2024
Homeमहत्वाची बातमीकुंटूंब रंगलेय बारावीच्या यशात

कुंटूंब रंगलेय बारावीच्या यशात

सासरे, सून, मुलगा उत्तीर्ण

सुनील बोडके

वाळुंज (त्र्यंबकेश्वर) : मागील दोन वर्षापासून कोरोनाने शाळा, कॉलेज तसेच ग्रामीण भागात अनेक अडचणीमुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला असताना त्याच ग्रामीण भागातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे येथील एकाच घरातील देहाडे कुटुंबायांनी मात्र इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

म्हणतात ना माणूस आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत विद्यार्थी असतो, त्याचप्रमाणे देहाडे कुटूंबातील कुटुंब प्रमुख लक्ष्मण मुरलीधर देहाडे (वय वर्ष ४५) यांनी आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करत इयत्ता १२ वीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला व ६४ टक्के गुण मिळवत तालुक्यात आदर्श घालून दिला आहे, त्याचबरोबर मोठी सून वृत्तिका ६४ टक्के व लहान मुलगा समीर ५५ टक्के गुण मिळवले आहे.

देहाडे कुटुंबियांच्या या यशाने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व शिक्षणा विषयी त्यांची गोडी या बदल अभिनंदन केले, यात तिघांनी मिळून एकत्र अभ्यास, चर्चा करून परीक्षा दिली आणि मोठे यश संपादन केले, यावेळी त्यांना मोलाची साथ दिली ती घरातील अन्य सदस्य मुलगा तुषार लक्ष्मण देहाडे, तसेच पत्नी विमल लक्ष्मण देहाडे यांनी या यशात सर्वांचा मोलाचा वाटा असल्याची लक्ष्मण देहाडे सांगतात.

परिस्थिती मुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली कुटुंबियाणी मोलाची साथ देत यशाचा मार्ग सुकर केला, समाजाला शिक्षणा शिवाय पर्याय नाही, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात ते उगाच नाही, अजूनही पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे. – लक्ष्मण देहाडे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -