अहमदनगर : अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अहमदनगर जिल्ह्यात ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’ (No Vaccine No Entry) ही मोहिम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात ओमायक्रॉन पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नो वॅक्सिन नो एन्ट्री ही मोहिम आजपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी आणि लसीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाऊ दिले जाणार नाही.