Thursday, April 25, 2024
Homeमहत्वाची बातमीपुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर येणार आयटीएमएस प्रणाली

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर येणार आयटीएमएस प्रणाली

ठिकठिकाणी एचडी कॅमेरे बसवणार असल्याची फडणवीसांची सभागृहात माहिती

मुंबई : भविष्यात हायवेवर अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी अचूक लोकेशन मिळावे यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रणाली बसवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis informed in the conference that HD cameras will be installed) यांनी दिली. विनायक मेटेंच्या अपघातानंतर पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधत त्यांनी ही घोषणा केली आहे. विनायक मेटेंच्या अपघाती निधनावर अधिवेशनात विधान परिषदेत चर्चेवेळी फडणवीसांनी ही माहिती दिली.

फडणवीस म्हणाले की, मेटेंच्या अपघाती निधनाबाबत अनेक गोष्टी कार्यकर्ते व त्यांच्या पत्नींनी माझ्याजवळ उपस्थित केल्या आहेत. मेटेंच्या चालकाने ओव्हरटेक करताना अपघात झाल्याचे ते म्हणाले. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली असून, याबाबत विस्तृत माहिती समोर आल्यावरच बोलता येईल. मात्र गंभीरबाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही असे म्हटले गेले. मात्र चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मु़ंबई व रायगड पोलिस त्यांचा रस्त्यात शोध घेत होते. मात्र एक प्रवासी मदतीसाठी थांबला. त्याने आयआरबीकडे मदत मागितल्यावर ७ मिनिटात मदत मिळाली.

मात्र ही यंत्रणा चुकीची आहे. अपघात झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणे सोपे होते अशी यंत्रणा उभी करण्यावर आम्ही भर देणार असल्याचे ते म्हणाले. लेन सोडून चालणाऱ्या ट्रेलरवर कारवाई करणार, लेन सोडून जाणाऱ्या ट्रेलरची माहिती मिळाल्यास थेट कारवाई करता येईल अशी यंत्रणा उभी करणे गरजेचे असून त्यावर आम्ही अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी सभागृहात दिली.

एक्स्प्रेस वे वरील आयटीएमएस प्रणाली अशी असेल

आयटीएमएस म्हणजे हायवेवर किंवा रस्त्यांवर एचडी कॅमेरा बसवणे होय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर ठिकठिकाणी एचडी (हाय डेफिनिशन) कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे कॅमेरे ३०० मीटर अंतरावर बसवलेले असतात. यामुळे एक्सप्रेस वेवरील कोणत्याही भागातून चालकांच्या हालचाली कॅप्चर करता येतात. शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आयटीएमएस ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

यामध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर द्वारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक करावाई केली जाते. ४० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास त्याला दंड केला जातो. या यंत्रणेत कॅमेऱ्यांद्वारे वाहनांची नंबर प्लेट पाहून चालकाने मोडलेला नियम रेकॉर्ड केला जातो. ज्या दिवशी नियम मोडला, त्यादिवशी तारीख आणि वेळ असलेला फोटो थेट नियंत्रण कक्षाला पाठवला जातो आणि तिथून चालकाच्या पत्त्यावर दंडासाठी ऑनलाईन कारवाई केली जाते.

दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) महापालिका संस्था असलेल्या ५७ जिल्हा मुख्यालयी शहरांमध्ये लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शहरी व आंतरजिल्हा वाहतुकीचे प्रभावी संचालन आणि देखरेख करणे आवश्यक आहे. व्हिडीओ वॉलद्वारे वाहतुकीचे प्रभावी निरीक्षण केले जावे आणि वाहतूक कोंडी होऊ देऊ नये. यासाठी ही प्रणाली उपयोगी पडेल, अशी माहिती त्यांनी दिली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -