मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका असतानाच कावीळ, मलेरिया, चिकनगुनिया या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. २६ दिवसांत साथीच्या आजारांमध्ये दुप्पट वाढ झाल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढल्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. पावसाळ्यानंतरही हे आजार वाढत असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
१ ते २६ डिसेंबरपर्यंत मलेरियाचे २३५, गॅस्ट्रोचे ३४९, डेंग्यूचे ३७, कावीळचे ३०, चिकनगुनियाचे १०, लेप्टोचे ४ रुग्ण आढळले आहेत. तर एच १ एन १ रुग्ण आटोक्यात असून गेल्या १९ दिवसांत एकही स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला नाही. तर वर्षभरात लेप्टोमुळे ४ तर डेंग्यूची लागण होऊन ३ जण दगावल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
एकीकडे कोरोना आणि उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे तर दुसरीकडे साथीचे आजार रोखण्याचे आव्हान पालिकेसोर आहे. त्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.
१ ते २६ डिसेंबरपर्यंतचे रुग्ण
मलेरिया – २३५
गॅस्ट्रो – ३४९
डेंग्यू – ३७
कावीळ – ३०
चिकनगुनिया – १०
लेप्टो – ४