Friday, April 19, 2024
Homeताज्या घडामोडीराजकीय दबावामुळे आश्रय योजनेतील प्रस्ताव मागे

राजकीय दबावामुळे आश्रय योजनेतील प्रस्ताव मागे

भाजपचा आक्षेप

मुंबई (प्रतिनिधी) : पुनर्विकासाच्या आश्रय योजनेअंतर्गत पालिकेतील सफाई कामगारांच्या माहिम आणि प्रभादेवी येथील वसाहतींचा प्रस्ताव बुधवारी प्रशासनाने स्थायी समितीतून मागे घेतला आहे. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. यात १२पैकी केवळ एक कंपनी मराठी होती. नेमका तोच प्रस्ताव प्रशासनाने मागे का घ्यावा, असा प्रश्न भाजपने विचारला आहे.

आश्रय योजनेअंतर्गत माहिम आणि प्रभादेवी येथील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचे कंत्राट बी.जी. शिर्के या कंपनीला देण्यात येणार होते. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. मात्र, या प्रस्तावातील त्रुटींवर आक्षेप घेत तो प्रस्ताव स्थायी समितीने पुन्हा प्रशासनाकडे पाठवला. मात्र प्रशासनाच्या या भूमिकेवर भाजपने आक्षेप घेतला. प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेण्यासाठी कोठतेही ठोस कारण दिले नाही. प्रशासकीय कारणामुळे प्रस्ताव मागे घेतला जात आहे असे सांगण्यात आले. यामुळे मराठी कंपनीचा प्रस्ताव मागे का घेतला जात आहे, त्याची ठोस कारणे देणे गरजेचे आहे, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

तर केवळ शिवसेनेच्या राजकीय दबावामुळे आयुक्तनि प्रस्ताव मागे घेतला असल्याचे भाजप प्रवक्ता, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे. कारण यात केवळ एकच कंपनी ही मराठी होती आणि असे असताना ही कोणतेही कारण न देता हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -