Saturday, April 20, 2024
Homeताज्या घडामोडीउद्यापासून सर्वसामान्य साधणार थेट केंद्रीय मंत्र्यांशी संवाद

उद्यापासून सर्वसामान्य साधणार थेट केंद्रीय मंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने सामान्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. उद्यापासून पुन्हा भाजप कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांसाठी सहकार विभाग सुरू होत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधता येणार असल्याचे भाजप पक्षाने जाहीर केले आहे.

उद्यापासून सर्व केंद्रीय मंत्री वेळापत्रकाप्रमाणे भाजप मुख्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप सहकार सेलचे समन्वयक नवीन सिन्हा यांनी दिली आहे. कार्यकर्ते आणि सामान्यांच्या समस्या सोडवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. पहिल्या आठवड्याच्या वेळापत्रकांमध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, किरेन रिजिजू, अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव या केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -